ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. शिवाय, आमदारांच्या फोडाफोडीला वेग आल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सत्ताधारी भाजपला एका पाठोपाठ एक धक्के बसणे सुरूच आहे. योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपला गळती लागली आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या पाठोपाठ आता काही आमदार देखील भाजपला सोडचिठ्ठी देताना दिसून येत आहे. शिवाय, आगामी काळात आणखी काही नेते व आमदार भाजपाच्या सदस्यत्वाचा त्याग करतील असं देखील बोललं जात आहे. आता आणखी एका आमदाराने भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे आमदार योगीची साथ सोडताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशमधील शिकोहाबाद (फिरोजाबाद) चे भाजपा आमदार मुकेश वर्मा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला, “स्वामी प्रसाद मौर्य हे आमचे नेते आहेत. ते जो निर्णय घेतील आम्ही त्याला पाठिंबा देऊ. येत्या काही दिवसांत इतर अनेक नेते आमच्यासोबत येतील,” असे ते म्हणाले. त्यामुळे आगामी काळात भाजप सोबत किती आमदार रुजणार आणि किती आमदार साथ सोडणार हे येणारा काळच सांगेल.