इच्छुकांच्या नव्या फंडय़ामुळे अनेक जण खूश : अनेक गावांतील प्रकार
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राम पंचायत निवडणुका जाहीर होताच इच्छुक उमेदवार निवडून येण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. त्यामुळे वेगवेगळय़ा माध्यमातून मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी रात्री पाटर्य़ांचे बेत झडत आहेत. त्यामुळे नव्याने निवडणुकीला सामोरे जाणारे आणि जुने-जाणतेही आता निवडणुकीचा धुरळा उडवताना दिसत आहेत. बेळगावातील काही ग्राम पंचायतच्या कार्यक्षेत्रात घराघरात मटण पोहोचवून मतदारांना खूश करण्याचे काम सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या नवीन फंडय़ामुळे मतदार खूश होत असले तरी मते त्यांनाच देणार की नाही? हा तितकाच गंभीर विषय आहे.
निवडणुका जाहीर होण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मळण्यांच्या धांदलीत निवडणुकीचा गुलाल धुळण्यास सुरुवात केली होती. मागील दोन-तीन महिन्यांपासून गुप्त प्रचार करण्यावर अनेकांनी भर दिला होता. निवडणूक आयोगाने आता निवडणुका जाहीर केल्या आहेत. दोन टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात बेळगाव तालुक्मयाचा समावेश करण्यात आला असून 22 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीला आता चांगलीच रंगत चढली आहे.
बेळगाव तालुक्मयातील अनेक ग्राम पंचायतींमध्ये भाजपप्रणित ग्राम विकास आघाडी, काँग्रेसप्रणित ग्राम विकास आघाडीतील अनेकांनी पैशांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. काहींकडून तर ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये आपल्यालाच मत द्या, असे सांगत चक्क घराघरात मटण पोहोचविण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे तालुक्मयात हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. वेगवेगळय़ा माध्यमातून आमिषे दाखवून मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी चढाओढ लागली आहे. त्यामुळे आता मतदारांनीच याबाबत गांभीर्याने विचार करून योग्य उमेदवारांना मत द्यावे, असे मत जाणकारांतून व्यक्त केले जात आहे.
तालुक्मयातील दक्षिण भागात चर्चेचा विषय
बेळगाव तालुक्मयात 57 ग्राम पंचायतींसाठी मतदान होणार आहे. नुकताच मच्छे आणि पिरनवाडी ग्राम पंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देण्यात येत असल्याने तेथील निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, उर्वरित ग्राम पंचायतींमध्ये निवडणुकांचा धुरळा उडत आहे. तालुक्मयातील दक्षिण भागातील काही ग्राम पंचायतींमध्ये मतदान घालण्यासाठी चक्क घराघरात इच्छुक उमेदवार मटण पोहोचवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा एक चर्चेचा विषय आहे.
ग्राम पंचायत निवडणूक जाहीर झाल्याने मागील दोन दिवसांपासून इच्छुक उमेदवार अर्ज भरत आहेत. काहीजण अर्ज भरून प्रचारालाही लागले आहेत. सध्या ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात विविध माध्यमातून या कामाला चालना देण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राम पंचायतीच्या रणधुमाळीला खऱया अर्थाने सुरुवात झाली आहे.