काटय़ाची लढत देण्याचे युवा उमेदवारांचे मनसुबे
वार्ताहर/ बोरगाव
ग्रामीण भागात ग्राम पंचायत निवडणूक ही महत्त्वपूर्ण आणि प्रति÷sची मानली जाते. गावातील प्रथम नागरिक म्हणून ग्राम पंचायत अध्यक्षांकडे पाहिले जाते. या वेळी ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होऊन निपाणी तालुक्मयातील गावागावात मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. शिवाय उमेदवार व कार्यकर्ते प्रचाराच्या कामात गुंतले आहेत. विशेष करून महिन्याभरापासून तरुणांना निवडणुकीचे वेध लागले होते यामध्ये त्यांचा ‘इंटरेस्ट’ उल्लेखनीय आहे.
निपाणी परिसरातील कोगनोळी, अकोळ, बेनाडी, सौंदलगा, आडी, कुरली, कुन्नूर, मांगूरसह इतर मोठय़ा गावात ग्राम पंचायत निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यासाठी आजी-माजी दिग्गज तसेच तरुणांनी आतापासूनच निवडणुकीसाठी कंबर कसली असून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तरुण उमेदवारांनीही ग्रा. पं. सदस्य होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधल्याची चर्चा गावागावांत रंगताना दिसत आहे. गावातील मूलभूत सुविधा ग्रामपंचायतमार्फत पूर्ण होत असल्याने सुशिक्षित तरुणांचा कल स्थानिक निवडणुकीकडे आकर्षित झाल्याचे दिसून येत आहे. राज्य शासनाकडून ग्राम पंचायतींना थेट निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्या शासनाकडून ग्राम पंचायतींना विकासकामासाठी थेट निधी मिळत असला तरी कामांचा दर्जा खालावलेला असल्याच्या घटना अनेक ठिकाणी पहावयास मिळालेल्या आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागातील सुत्र आणि सुशिक्षित तरुणांनी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.