सत्तरी भूमिपुत्र संघटनेची मागणी
प्रतिनिधी /वाळपई
येणाऱया विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने सत्तरी तालुक्यातील मालकीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी कुमठोळ सत्तरी या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सतरी भूमिपुत्र संघटनेतर्फे ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
या पत्रकार परिषदेत बोलताना आंतानियो पिंटो यांनी सांगितले की सत्तरी तालुक्मयात गेल्या अनेक वर्षापासून वनखाते व भूमिपुत्र यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होताना दिसत आहे. काही महिन्यापूर्वी बंदिरवाडा याठिकाणी अभयारण्याचे अधिकारी व स्थानिक यांच्या दरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. वनखात्याची यंत्रणा म्हणजे भूमिपुत्रासमोर मोठी डोकेदुखी ठरलेली आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता सरकारने अभयारण्याची अधिसूचना जाहीर केली तेव्हापासून या भागातील भूमिपुत्रासमोर अनंत अडचणी निर्माण झालेले आहेत. त्या दूर करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सनदशीर मार्गाने विनंती करूनही त्याकडे अजिबात लक्ष देण्यात आलेले नाही. यामुळे येणाऱया विधानसभा निवडणुकीपूर्वी जमीन मालकीच्या प्रश्नासंदर्भात सरकारने आपले धोरण जाहीर करावे अशा प्रकारचे विनंती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली. शिवाजी गावस, अर्जुन गावडे, बाते गावडे यांनीही यावेळी मते मांडली.