प्रतिनिधी / मडगाव
सरकारने मायनिंग लवकरात लवकर सुरु करण्याची गरज आहे. निवडणूक जवळ आल्याने जनतेला नुसतीच आश्वासने देऊन फसविण्याचा प्रयत्न करु नये. राज्यातील अनेक लोक खनिज व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा त्यांचा व्यवसाय सुरळीतपणे सुरु करण्यास सरकारने मदत करण्याची गरज आहे. राज्यातील जनतेला रेल्वे मार्गाचे दुपरीकरण नको आहे. त्यामुळे सरकारने जनतेचे ऐकून ते त्वरित रद्द करण्याची गरज आहे. रेल्वे दुपरीकरणासंदर्भात आंदोलन करणाऱया आंदोलकावर एफआयआर नोंद केलेली आहे ते सरकारने मागे घ्यावी अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केली आहे.
मडगाव दक्षिण गोवा काँग्रेस कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकार परिषदेला दक्षिण गोवा काँग्रेस समितीचे अध्यक्ष ज्यो डायस व एम. के शेख उपस्थित होते.
रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला विरोध करणारे आंदोलक गोवा वाचविण्यासाठी रेल्वे रुळावर बसून आंदोलन करत होते. सरकारच्या विरोधात ते आंदोलन करत नव्हते. दर पाच वर्षानंतर निवडणूक येत, तेव्हा जनताच सरकारला निवडून देते पण हे सरकार जनतेने निवडलेले सरकार नाही अशी टीका देखील श्री. सार्दिन यांनी केली.
100 कोटी जनतेच्या हितासाठी वापरावे
कोरोनामुळे अनेक युवक बेरोजगार झालेले आहेत. आता त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बेरोजगार संदर्भात समस्या दूर कराव्या. 19 डिसेंबर रोजी होणाऱया 60व्या गोवा मुक्तीदिनानिमित्त 100 कोटी रुपये खर्च करुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे सरकार प्रयत्न करत आहे. सरकारने तेच पैसे जनतेच्या हितासाठी वापरावे असा सल्ला त्यांनी दिला.
सरकारने कदंब बससेवा वाढवावी
खासगी कंपनीमध्ये काम करणारे कामगार आता वेळेवर कामाला पोहचत नाही. कारण, काही खासगी बसमालकांनी कोरोनामुळे बसेस बंद ठेवलेल्या आहेत. त्यामुळे सरकारने कदंब बसेस वाढवण्याची आवश्यकता आहे. सरकार शेतकऱयांसाठी काहीच करत नसून उलट शेतकऱयांना त्रास देण्याचे काम करताना दिसत आहे. दोन ते तीन वर्षापासून संजीवनी साखर कारखाना बंद पडलेला आहे. गोव्यात पुर्वी बैलांची कत्तल केली जात असल्यामुळे ख्रिस्ती व मुस्लिम बांधवांसाठी स्वतस्त दरात बीफ उपलब्ध होत होते. आता इतर राज्यातून बीफ आयात केले जात असल्याने लोकांना महाग दराने बीफ उपलब्ध होत आहे. जे लोक बीफ खातात त्यांना ते स्वस्त दरात देण्याचे प्रयत्न करावे. कांदा सुद्धा महाग झालेला आहे. एकादी वस्तू महाग झाल्यास आज ती स्वस्त होत नाही. याचा फटका आज सर्वसामान्य जनतेला बसत असल्याचे सार्दीन यांनी पुढे बोलताना सांगितले.
चर्चिल कोण हे जनतेला बऱयापैकी ठाऊक आहे
चर्चिल आलेमाव यांना निवडून आणण्यासाठी पक्षाने सांगितले होते. त्यानुसार प्रमाणिकपणने मी त्याच्यासाठी कार्य केले व त्यांना निवडून आणले होते. आलेमाव ते आता विसरल्याचे दिसत आहे. पण त्याच्याकडून मी पैसे घेतले नाही. आलेमाव कोण हे जनतेला माहित असून त्यामूळे त्यांच्यासंदर्भात अधिक बोलून कोणताही फायदा नसल्याचे सार्दीन यावेळी म्हणाले.