प्रतिनिधी/ बेळगाव
भारतासाठी सर्वस्व अर्पण करणाऱया भगिनी निवेदिता यांच्याकडून प्रेरणा घेऊया आणि भारत सुरक्षित ठेऊया, असे विचार काकडे फौंडेशनचे अध्यक्ष विवेकानंद केंद्र बेळगावचे कार्यकर्ते किशोर काकडे यांनी व्यक्त केले. बुधवारी अनगोळ येथील विद्या वाचनालय व विवेकानंद केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या कार्यालयात तनुजा दड्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
प्रारंभी बाबुराव शिंदोळकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सुरेश खर्डे यांनी परिचय करून दिला. प्रारंभी दीपप्रज्वलन व भगिनी निवेदितांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मोबाईल, इंटरनेट, विमान नसताना आजच्या कोरोनाप्रमाणे प्लेगच्या भयानक स्थितीत मार्गारेट एलिझाबेध नोबल यांनी स्वामी विवेकानंदांची दिक्षा घेऊन निवेदिता झाल्या, असे काकडे म्हणाले. अध्यक्षा तनुजा दड्डीकर यांनी या कालावधीत वाचनासाठी व इतर चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी योग्य वापर करण्याचे आवाहन केले.
प्रारंभी शहीद झालेल्या जवानांना व कोरोनाशी सामना करताना आपला जीव गमावणाऱयांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विद्या विकास मंडळासाठी विवेकानंद केंद्राने हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार मानत देणगी देत शिला स्मारकाच्या पुस्तिका देण्यात आल्या. यावेळी नारायणराव सोमणाचे, पांडुरंग धाकलूचे, महादेव शहापूरकर, सरस्वती शिंदोळकर सुनिता शिंदोळकर व मुलींनी भाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.