महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत आहे. छ. शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचा अवमान वारंवार होत आहे. त्यामुळे तीव्र पडसाद उमटले होते. मात्र मराठी भाषिक तरुणांना लक्ष्य बनवून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्राने प्रयत्न करावेत, अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नगरसेवक रवी साळुंखे यांनी केली.
मराठी भाषिक तरुणांवर राजद्रोहसारखे गुन्हे दाखल केले आहेत. अशाप्रकारे अनेकवेळा त्रास देण्यासाठी त्या युवकांवर गुन्हे घातले जात आहेत. कर्नाटक सरकार नाहक त्रास देत आहे. तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा करून निष्पाप तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.