ऑनलाईन टीम / पुणे :
अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ अलिबागपासून समुद्रात ११५ किमी, मुंबई पासून दक्षिण पश्चिमेला १६५ किमी तर सुरत पासून ४०० किमी अंतावर आहे. हे वादळ अलिबागच्या दिशेने सरकत असून त्याचा वेग १३० किमी, तर ते किनाऱ्यावर धडकत असताना वाऱ्याचा वेग १२५ किमी इतका असेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. हे वादळ ११ ते १ वाजण्याच्या दरम्यान धडकणार आहे.
चक्रीवादळाविषयीच्या अधिक बातम्यांसाठी भेट द्या https://tarunbharat.com