नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
वैशाख बौद्ध पोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी हवामान पद्धतीमध्ये बदल होत असल्याचे सांगत नद्या, जंगलं संकटात असल्याचा उल्लेख करत निसर्गाचा आदर करणं ही बुद्ध यांनी दिलेली शिकवणं महत्वाची असल्याचं सांगितलं.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना हे मोठं आव्हान असून आपण त्याचा सामना करत आहोत. हवामानात होणारे बदल, बदलती जीवनशैली पुढील पिढीसाठी धोकादायक आहे. हवामान पद्धतीत बदल होत असून धृवांवरील बर्फ वितळत आहे, नद्या, जंगलं संकटात आहेत. गौतम बुद्धांनी आपल्याला निसर्गाचा आदर करण्याची शिकवण दिली आहे, ती महत्त्वाटची असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. गौतम बुद्ध यांचं जीवन शांतता, एकता आणि सुसंवाद यांच्याशी जोडलेलं होतं. पण आजही आपल्यातील काही घटक समाजात तिरस्कार, दहशत आणि हिंसा परसरवत आहेत. मानवतेवर विश्वास असणाऱ्या सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून त्यासाठी गौतम बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं गरजेचं असल्याचे त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.
यावेळी त्यांनी कोरोना महामारीदरम्यान, दुसऱ्या लाटेला सर्वच सामोर जात आहेत. वर्षभरात कोरोनावर लस शोधणाऱ्या वैज्ञानिकांचा सार्थ अभिमान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी जगभरातील ५० पेक्षा जास्त बौद्ध भिक्खुंनी या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला होता. यावेळी निसर्गाचा आदर करणं, पृथ्वीचे संवर्धन ही बुद्ध यांनी दिलेली शिकवण अतिशय महत्त्वाची आहे. कोरोना संकटात सगळ्यांनीच बुध्दांची शिकवण आचरणात आणली पाहिजे. जगभरातल्या मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी असलेला भारतही शाश्वत विकासाच्या मार्गावर चालत आहे याचा अभिमान असल्याचेही पंतप्रधान यांनी म्हटले आहे.