ऑनलाईन टीम / जळगाव :
निसर्ग चक्रीवादळाने आज पहाटे जळगाव जिल्ह्यात चाळीसगावला प्रवेश केला. हे वादळ पाचोरा जळगावमार्गे मध्यप्रदेशाकडे गेले असल्याची माहिती जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
चक्रीवादळ जळगाव मार्गाने जाण्याच्या सुचना येताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचा नियंत्रण कक्ष रात्रभर परिस्थितीवर लक्ष ठेवून होता. 25 ते 30 किमी वेगाने हे वारे वाहात होते.
दरम्यान, अरबी समुद्रात घोगांवणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाने काल अलिबागला धडक दिली. त्यानंतर ते पुढे सरसावले. राज्याला चक्रीवादळाचा तडखा बसला असला, तरी मोठी जिवीत हानी रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.