नि सर्ग म्हणजे सृष्टी. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचतत्त्वांनी बनलेली सृष्टी. या निसर्गाचे व मनुष्याचे नाते अगदी त्याच्या जन्मापासूनचे असते. मनुष्याचा जन्म याच निसर्गाच्या पंचतत्त्वातूनच होतो व त्याच पंचतत्त्वात विलीन होतो. तेव्हा आपले व निसर्गाचे नाते अतूट नाही का ? आपण या निसर्गात जन्म घेतो, वाढतो व शेवटी विलीन होतो. आणि म्हणूनच या निसर्गाचं जतन करणे, पोषण करणे त्याची वृद्धी करणे, हे आपले कर्तव्य आहे.
निसर्ग हाच आपला गुरु, हाच आपला मित्र व हाच आपला डॉक्टरसुद्धा आहे. निसर्ग आपणाकरीता खूप मोठे वरदान आहे. त्याच्याकडून आपणास आवश्यक सर्व घटक जसे पाणी, राहण्यास घर व अन्नसुद्धा मिळते. निसर्गाकडून आपणास किती काही शिकायला मिळते. जसे फूल काटय़ात फुलते तसे आपणही प्रत्येक संकटात हसत राहवे. झाडांप्रमाणे खंबीर उभे राहून नेहमी दुसऱयांना मदत करणे. नदी जशी कितीही अडथळे आली तरी वाहते तसंच आपणही सर्व कष्टांना न घाबरता सामोरे जाणे. आणखी बरंच काही हा निसर्ग आपणास शिकवतो.
निसर्ग तर खरा चित्रकार आहे. किती रम्य चित्र तो रोज रंगवतो व आपणास प्रेरणा देतो. खोल दऱया खोऱया, निर्मळ झरे तलाव, रम्य अथांग सरोवरे, बेफाम समुद्र, घनदाट अरण्य, बर्फाच्छादित शिखरे, उत्तुंग पर्वत, कमळांनी भरलेली तळे, वाऱयाच्या झोक्मयावर डोलणारी हिरवीगार शेते, नारळी केळांच्या बागा, डोंगराआडून उगविणारा सूर्य व त्याची सोनेरी आकाशात गुलाल उधळणारी किरणे. हे सर्व किती किती सुंदर आहे. आणि याचा अनुभव आपण रोज करतो.
एवढंच नाही तर या निसर्गात सामावतात ते वेगवेगळे ऋतू. हे निसर्गाचे ऋतुचक्र पण जाता जाता दु:खानंतर सुख येतेच, असा संदेश देत जातात. रिमझिम पाउस व त्यामुळे उठणारा मातीचा सुगंध, तसेच थंड वाऱयाची झुळुक व त्या बरोबर येणारा फुलांचा सुगंध, उन्हाळय़ात हीच झुळूक मनाला जीवाला किती मनमोहक वाटते. समुद्राच्या लाटा, पक्षांची किलबिल, सकाळची सूर्याची कोवळी किरणे, सूर्यास्ताच्या वेळीस तांबूस होत जाणारे आकाश, सर्व काही निसर्गाची किमया आहे. निसर्गाने आपणास दिलेली देणगी आहे.
निसर्ग आपणास जिवलग मित्राप्रमाणेच काहीही न मागतादेखील केवढं काही देतो. मग आपणही या निसर्गाला काहीतरी दिले पाहिजे. वाढत्या आधुनिकीकरणामुळे व वाहतूक पाणी प्रदूषणामुळे निसर्गाचे सौंदर्य दिवसेंदिवस कमी होत आहे. आकाशातील चांदोबा उंच उंच इमारतीच्या मागे लपलेला आहे. जंगल तोडीमुळे पाउस कमी पडत आहे आणि यामुळे निसर्गाच्या भयंकर रूपाचे दर्शन आपणास घडत आहे. अतिवृष्टीने नदी नाल्यांना पूर येऊन शहरेच्या शहरे नष्टा होत आहेत. तर कधी भूकंपाने हजारो घरे जमीनदोस्त होत आहेत. तेव्हा आपलं हे कर्तव्य आहे की निसर्गाचे संतुलन ठेवले पाहिजे कारण मनुष्याचं व निसर्गाचं अतूट नाते आहे. आणि निसर्ग हाच माझा सोबती, सखा व मित्र आहे.