प्रतिनिधी/ बेळगाव
मागील वषीच्या अतिवृष्टीमुळे घरे कोसळलेल्या नुकसानग्रस्तांना अद्याप सरकारी मदतीचा निधी मिळाला नाही. मात्र, काही नुकसानगस्तांना नोटीस बजावून घराचे बांधकाम करा, अन्यथा अनुदान रद्द करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे महापालिका आणि महसूल विभागाच्या भोंगळ कारभाराचा नमुना चव्हाटय़ावर आला आहे. यामुळे ही बाब जिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून देऊन नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे नुकसानभरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. मागील वषी ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसात अनेक नागरिकांची घरे कोसळून नुकसान झाले आहे. काही नागरिकांची घरे भुईसपाट झाली असून डोक्मयावरचे छत हिरावले आहे. शासनाकडून मिळणाऱया निधीमधून घर उभारण्याच्या अपेक्षेने महापालिकेकडे अर्ज केला होता. मात्र, शासनाकडून अद्यापही काही नागरिकांना नुकसानभरपाई देण्यात आली नाही. आतापर्यंत सर्वेक्षण करण्यात आलेल्या नागरिकांना एक लाखाच्या निधीचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. पण उर्वरित निधी मंजूर करण्यात आले नाही. घरांचे नुकसान झालेले 43 नागरिक अद्याप मदतीपासून वंचित आहेत. मात्र, घराचे बांधकात तातडीने पूर्ण करा, अन्यथा अनुदान रद्द करण्याचा इशारा नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. नुकसानभरपाई देण्यापूर्वी नोटीस बजावण्यात आल्याने मनपा व महसूल विभागाच्या बेजबाबदार कारभाराचा नमुना चक्हाटय़ावर आला आहे. काही नुकसानग्रस्तांनी दिलेल्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याऐवजी दुसऱया खात्यात रक्कम जमा करून ती जमा केल्याचे पत्र देण्यात आल्याने गोंधळ उडाला आहे. त्यामुळे गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी. तसेच नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी विनायक गुंजटकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकाऱयांच्या अनुपस्थितीत शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांनी स्वीकारले. यावेळी नुकसानग्रस्त नागरिक उपस्थित होते.