कणकिरे, गुळेली परिसत चक्रीवादळाचा परिणाम : कृषी, महसूल, साबांखाकडून नुकसानीचे सर्वेक्षण
प्रतिनिधी / वाळपई
सत्तरी तालुक्मयातील कणकिरे, गुळेली भागांमध्ये सोमवारी दुपारी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्मयता आहे. कृषी खाते तसेच मामलेदार कार्यालयाच्या वतीने या सर्वेक्षणाचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. यामध्ये अनेकांच्या घरांची पडझड व बागायतींचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱयांनी आपल्या नुकसानीचे दावे विभागीय कृषी कार्यालयात शक्मय तितके लवकर सादर करावेत व यानुसार अधिकाऱयांनी ताबडतोब पाहणी करून ते मंजुरीसाठी वरि÷ अधिकाऱयांकडे सादर करावे. असा आदेश कृषी संचालक नेविल यांना दिला आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी नुकसानग्रस्त घरांना आपण आर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.
सोमवारी दुपारी गुळेली पंचायत क्षेत्रातील कणकिरे व गुळेली भागाला चक्रीवादळाचा जबरदस्त फटका बसला व यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली. अवघ्या अर्धा तास झालेल्या वादळामुळे गावातील जवळपास बहुतांश घरांना फटका बसला, यामध्ये अनेक घरांच्या छपराचे पत्रे उडून गेल्यामुळे घरातील सामानाची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली आहे. त्याचप्रमाणे कृषी बागायतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेली आहे. प्राथमिक अंदाजानुसार कृषी विभागाकडून सुमारे पंधरा लाखांचे नुकसान होण्याची शक्मयता वर्तविली आहे. विभागीय कृषि अधिकारी विश्वनाथ गावस यांनी सोमवारपासून यासंदर्भात सर्वेक्षण हाती घेतले आहे. मंगळवारी त्यांनी कृषी कर्मचाऱयांनी या भागात जाऊन नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला. तलाठी सूर्यकांत राणे यांनी संबंधीत भागाला भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. त्यांनी यासंदर्भात अहवाल तयार केला असून तो लवकरात लवकर मामलेदार कार्यालयास सादर करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
सांबांखतर्फे नुकसानीचे सर्वेक्षण
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत विभागातर्फे पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण मंगळवारपासून सुरू केले आहे. ज्या घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल संबंधीत पथकाने तयार केला आहे. तो अहवाल लवकरात लवकर संबंधित खात्याच्या यंत्रणेकडे सादर करणार असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या अंदाजानुसार रकमेचा आकडा सुमारे 15 लाख असण्याची शक्मयता वर्तविली आहे.
नुकसानीची दावे त्वरित सादर करा !
दरम्यान, कृषी खात्याच्या यंत्रणेने पाहणी करून या नुकसान भरपाईचा आढावा घेतला आहे. कृषी खात्याच्या संचालकांनी मंगळवारी संबंधित नुकसानग्रस्तांना आपल्या नुकसानीचे दावे त्वरित सादर करण्याची विनंती केली आहे. त्याचप्रमाणे वाळपई विभागीय कृषी कार्यालयाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधून शेतकऱयांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रस्ताव त्वरित तयार करा व मंजुरीसाठी वरि÷ अधिकाऱयांपर्यंत पोहोचवा, असे आदेशही संबंधीत कर्मचाऱयांना दिले आहेत.
नुकसान भरभाई त्वरित द्या : लवू गावकर
माजी पंचायत सदस्य लवू गावकर यांनी सांगितले की, या चक्रीवादळामुळे गावाला जबरदस्त फटका बसलेला आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून सरकारने याची गंभीर दखल घेत या भागाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नुकसान भरपाई त्वरित देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी लवू गावकर केली आहे.
नागरिकांसमोर समस्या : अनंत गावस
चक्रीवादळाची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाची यंत्रणा ताबडतोब घटनास्थळी दाखल झाली. सध्यातरी अनेक घरावर कोसळलेली झाडे दूर करण्यात आली. यामध्ये घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे घरातील सामान्यांचीही नासधूस झाली आहे. रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्यात आली असून सध्या तरी रस्ता मोकळा आहे. मात्र घरांची मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्यामुळे नागरिकांसमोर समस्या निर्माण झाली आहे. अशी प्रतिक्रिया हवालदार अनंत गावस यांनी व्यक्त केली.
पंधरा लांखाचे नुकसान : विश्वनाथ गावस
चक्रीवादळामुळे व वादळी पावसामुळे गुळेली पंचायत क्षेत्रातील गुळेली व कणकीरे भागाला जबरदस्त फटका बसला. मोठय़ा प्रमाणात कृषी बागायतीचे नुकसान झालेले आहे. विशेषतः केळी, माड, सुपारी यांची प्रचंड प्रमाणात नुकसानी झाली आहे. यामध्ये प्रभाकर गावकर यांच्या बागायतीचे मोठे नुकसान झाले असून यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. शेतकरी बांधवांना आपल्या नुकसानभरपाईचे कागदपत्रे विभागीय कृषी कार्यालयात सादर करण्याची विनंती करण्यात आल्याचे गावस यांनी यावेळी सांगितले.
पाच लांखाचा फटका : प्रभाकर गावकर
झालेल्या चक्रीवादळामुळे आपल्या बागायतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याची प्रतिक्रिया प्रभाकर गावकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली. सुमारे 60 सुपारीची झाडे व 20 पेक्षा जास्त नारळाची झाडे जमीनदोस्त झालेली आहे. तसेच केळी बागायतीचेही मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये आपले एकटय़ाचेच सुमारे पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे प्रभाकर गावकर यांनी सांगितले.
सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे : नितेश गावडे.
गुळेली पंचायत क्षेत्रामध्ये घडलेल्या नैसर्गिक पडझडीची सरकारने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी उपसरपंच नितेश गावडे यांनी केली आहे. आपण या भागाचा दौरा केला असून कृषी अधिकारी व मामलेदार कार्यालयाकडून सर्वेक्षण केले आहे. तसेच अग्निशामक दलाच्या जवांनांनी घरांवर कोसळलेली झाडे हटवून नागरिकांना चांगले सहकार्य केले, अशी माहिती यावेळी नितेश गावडे यांनी दिली.