प्रतिनिधी/ बेळगाव :
बेळगाव तालुक्मयात मागील वषी आलेल्या महापूरामध्ये मोठे नुकसान झाले आहे. विशेष करुन गरीब कुटुंबे बेघर झाले आहेत. अनेकांचे संसार उघडय़ावर आले आहेत. मात्र त्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. जर नुकसान भरपाई द्यायची नसेल तर घोषणा कशासाठी करायची? असा सवाल जिल्हा पंचायतचे उपाध्यक्ष अरुण कटांबले यांनी तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांना केली. संबंधितांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
नुकतीच त्यांनी तहसीलदार कार्यालय येथे ताशिलदार कुलकर्णी यांची भेट घेवून तालुक्मयाचा आढावा घेतला. यावेळी कंग्राळी ग्राम पंचायतीचे सदस्य चेतक कांबळे, एसडीएमचे माजी अध्यक्ष उमेश चौगुले, देवस्थान पंच कमिटीचे सदस्य तुकाराम चौगुले, एसडीएमसी सदस्य जयराम पावशे, आदी उपस्थित होते. तलाठय़ांच्या चुकीच्या कारभारामुळे अनेकांना फटका बसला आहे. त्यामुळे अनेकांवर भाडोत्री घरात राहण्याची वेळ आली आहे. मागील वर्षभरापासून स्वतःच्या घरात राहण्यासाठी नागरिक धडपडत आहेत. मात्र पिडीओ आणि तलाठय़ांच्या कारभारामुळे समस्या झाल्या निर्माण झाल्या आहेत, त्या तातडीने सोडवाव्यात.
बेळगाव तालुक्मयातील अनेक घरे मागील वषीच्या महापूरात कोसळली आहेत. पहिला हप्ता आला असला तरी दुसरा आणि तिसरा हप्ता आलेला नाही. त्यामुळे घरांची कामे अर्धवट पडली आहेत. ही समस्या तातडीने सोडवावीत. लॉकडाऊनमध्ये सर्व तहसिलदार कार्यालयातील कामे रेंगाळली आहेत त्यांना गती द्यावी आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही कटांबले यांनी सांगितले.
सध्या यावषी पडलेल्या पावसामुळे काहींची घरे कोसळली आहेत. मात्र त्यांची नोंद करुन घेण्यास अजूनही प्रयत्न करण्यात येत नाहीत. त्यामुळे संबंधितांना आपण सर्व्हे करण्याचे सांगावे. याचबरोबर जी गरीब कुटुंबे आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही जि. पं. उपाध्यक्षांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांनी याबाबत चौकशी करुन आपण अहवाल पाठवून दिला आहे. मात्र सरकारकडून अजूनही अनुदान आलेले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास उशीर होत आहे. आपण तालुक्मयातील सर्व अहवाल जिल्हाधिकाऱयांकडे पाठविला आहे. त्यांनी तो सरकारकडे पाठवून दिला आहे. मात्र अजूनही नुकसान भरपाई देण्यासाठी अनुदान न आल्याने समस्या निर्माण होत आहेत. जोपर्यंत सरकारकडून निधी येत नाही तोपर्यंत आपण काहीच करु शकत नसल्याचे सांगितले.