प्रतिनिधी /मडगाव
राज्यात आज अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. यावर तोडगा काढण्याचा कुणीच प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे युवकांनी राजकारणात उतरण्याची गरज आहे. भाजप सरकारने राज्यातील पर्यावरण नष्ट करणारे प्रकल्प आणलेले आहेत. हे सर्व प्रकल्प रद्द करण्याची गरज आहे. नुवे मतदारसंघातील लोकांच्या गाठीभेटी घेऊन यंदाच्या विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजू काब्राल यांनी सांगितले.
मडगाव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस पक्षाने जर उमेदवारी दिल्यास कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली जाईल. तसेच काँग्रेसच्या अनेक सभेत सुद्धा उपस्थिती लावलेली आहे. तसेच नुवे मतदारसंघातील लोकांना मदत करण्याकरिता कार्यालय उघडण्यात आले असल्याचे काब्राल म्हणाले.