शिक्षणतज्ञ-माजी कुलगुरु डॉ. मीना चंदावरकर : नवीन धोरणात तंत्रज्ञानाला अधिक महत्त्व : महिलांसाठी अधिक उपयुक्त
प्रतिनिधी / बेळगाव
शिक्षण पद्धतीमध्ये भारतीयत्व आणणे हाच नूतन शैक्षणिक धोरणाचा हेतू आहे. त्यामुळे हे शैक्षणिक धोरण शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवत विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण करणारे असेल, असा विश्वास विजापूरच्या महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू व शिक्षणतज्ञ डॉ. मीना चंदावरकर यांनी व्यक्त केला.
शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे राज्य मराठी विकास समितीच्या अनुदान योजनेंतर्गत मीना चंदावरकर यांची मुलाखत झाली. प्रा. माधुरी शानभाग यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. झूम मीटिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला.
स्वातंत्र्यानंतरच्या शिक्षण पद्धतीत काय बदल झाले? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, 2040 पर्यंत आपली शिक्षण व्यवस्था उत्कृष्ट शिक्षण व्यवस्था व्हायला हवी, हे नूतन शैक्षणिक धोरणाचे वैशिष्टय़ आहे. पूर्वीच्या शिक्षण पद्धतीत भारतीय संस्कृती, परंपरा, संस्कार, मूल्ये यांना महत्त्व होते. गुरुकुल पद्धतीत परीक्षांचे बंधन नव्हते व गुरू म्हणेल ते ब्रह्मवाक्मय होते. 1935 मध्ये लॉर्ड मेकॉलेने भारतीय शिक्षण संस्कृतीवर घाला घालून भारतीयांना गुलाम करणारी शिक्षण पद्धती अस्तित्वात आणली. भारतीय लोक संस्कृती व नितीमूल्यांना महत्त्व देतात. जोवर त्यावर आपण आक्रमण करत नाही तोवर त्यांना जिंकणे अशक्मय, असे मेकॉलेच्या अहवालात नमूद होते. परिणामी आपली संस्कृत भाषा कमी होऊन इंग्रजी ही उपजीविकेची भाषा झाली.
1948 मध्ये युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन आले. 1964-66 दरम्यान डॉ. डी. एस. कोठारी आयोग आला. 1968 आणि 1986 मध्ये नॅशलन पॉलिसी ऑफ एज्युकेशन अस्तित्वात आली आणि आता 2020 मध्ये एनईटी म्हणजे नूतन शैक्षणिक धोरण अस्तित्वात आले.
या शैक्षणिक धोरणाचे वैशिष्ट काय? या प्रश्नावर डॉ. मीना म्हणाल्या, हे धोरण विद्यार्थ्यांचा केवळ बौद्धिक नव्हे तर मानसिक, भावनिक, सामाजिक आणि विकासावर भर देणारे आहे. बहुशाखांचा अभ्यास करता येईल असे ते लवचिक आहे. विशेष म्हणजे महिलांसाठी ते अधिक उपयुक्त आहे. अनेक कारणास्तव ब्रेक घेतल्यानंतरसुद्धा महिलांना पुन्हा शिक्षण घेता येणार आहे. पूर्वीच्या अभ्यासातील गुण बँक ऑफ पेडिटमध्ये जमा होती व पुन्हा शिक्षण सुरू केल्यानंतर त्यांना त्याचा लाभ घेता येईल, हे वैशिष्टय़ होय.
नूतन शैक्षणिक धोरण आत्मनिर्भर करणारे असेल का? व शहरी आणि ग्रामीण हा फरक कमी होईल का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, अनुभवांतून आलेले शिक्षण नेहमीच महत्त्वाचे आहे. नूतन शिक्षण पद्धत स्वयंरोजगार निर्माण करणारी असणार आहे. विद्यार्थ्यांची क्षमता जितकी वाढेल तितक्मया त्यांना संधी मिळतील. मुख्य म्हणजे तंत्रज्ञानाला अधिक महत्त्व येईल. हे शैक्षणिक धोरण अभ्यासाला नव्हे तर ज्ञानाला महत्त्व देणारे आहे. ग्रामीण आणि शहरी किंवा गरीब आणि श्रीमंत हा फरक हळूहळू कमी होईल. विद्यार्थी संधीचा कसा लाभ करून घेतील त्यावर त्यांची प्रगती ठरेल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील भावनिक बंध नेहमीच महत्त्वाचे असून ते कायमच राहावेत, अशी अपेक्षा डॉ. चंदावरकर यांनी व्यक्त केली. प्रारंभी डॉ. लता लक्ष्मेश्वर यांनी सरस्वती वंदना सादर केली. अंजली गाडगीळ यांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. अरुणा नाईक यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन निर्मला कळ्ळीमनी यांनी केले. प्रश्नोत्तराचे सत्र मेधा देशपांडे यांनी सांभाळले. माधवी बापट यांनी आभार मानले.