प्रतिनिधी / कुरुंदवाड
विठ्ठल भक्तांना आषाढी ची पंढरीची वारी म्हणजे एक पर्वणीच असते. मात्र सध्या महामारी चा संसर्ग असल्याने पंढरीला विठ्ठल भक्तांना जाता आले नाही यामुळे अनेक विठ्ठल भक्तांनी आपल्या गावातीलच विठ्ठल मंदिरात जाऊन विठुरायाच्या चरणी माथा टेकला असे चित्र आज नरसिंहवाडी कुरूंदवाड परिसरात दिसून आले.
कुरूंदवाड शहरातील हरी मंदिर सावता माळी मंदिर तसेच चर्मकार समाज विठ्ठल मंदिर त्याचबरोबर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरातील विठ्ठल मंदिर बन भागातील सार्वजनिक विठ्ठल मंदिर येथेच दर्शनाचा लाभ वारकरी व विठ्ठल भक्तांनी घेतला आषाढी एकादशीनिमित्त सकाळपासूनच आपापल्या गावातील विठ्ठल दर्शनासाठी विठ्ठल भक्त येत होते प्रत्येक जण सोशल डिस्टंसिंग नियम पाळून दर्शन घेताना दिसत होता.
कुरुंदवाड परिसरातील सर्व विठ्ठल मंदिरामध्ये पूजाअर्चा महापूजा नैवेद्य आरती भजन-कीर्तन आधी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी दर्शनासाठी येणाऱ्या विठ्ठल भक्तांना उपवास असल्याकारणाने फराळाच्या पदार्थ तसेच केळी चिकू सफरचंद पेरू आदी फळांचे वाटप केले.
पंढरीप्रमाणे विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येणारे विठ्ठल भक्त वारकऱ्यांनी प्रमाणे त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करताना दिसत होते
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई फुलांची आरास करण्यात आली होती. एकूणच महामारीच्या संसर्गाच्या छायेखाली विठ्ठल भक्तांनी आपल्या गावातीलच विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेत पंढरीच्या विठुरायाला आठवले अशी भावना अनेक विठ्ठल भक्तांनी व्यक्त केली महामारी च्या संसर्गामुळे सर्वत्र साधेपणाने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.