मोदी सरकारचा निर्णय
वृत्तसंस्था/ कोलकाता
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने यंदा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीला ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. नेताजींचा पक्ष फॉरवर्ड ब्लॉकनेही तृणमूलला साथ दिली आहे. केंद्र सरकारने हा निर्णय विधानसभा निवडणूक डोळय़ासमोर ठेवून घेतला असल्याचा आरोप तृणमूल काँगेसने केला आहे.
नेताजींची 125 वी जयंती 23 जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. या दिनाला केवळ पराक्रम दिन म्हणून साजरा करणे पुरेसे नाही. 23 जानेवारी रोजी राष्ट्रीय सुटी जाहीर करण्यात यावी. बोस हे राष्ट्रीय नेते होते अणि आझाद हिंद सेनेचे प्रमुख होते. त्यांच्या जयंतीदिनी देशप्रमे दिवस साजरा करण्याची आमची मागणी होती, असे तृणमूल नेते सौगत रॉय यांनी म्हटले आहे.