वृत्तसंस्था/काठमांडू
नेपाळ आणि चीनच्या मैत्रीतही आता अंतर पडू लागले आहे. नेपाळमधून येणाऱया सामग्रीवर कोरोनाचे निमित्त पुढे करत चीनने अघोषित बंदी घातली आहे. मागील 10 महिन्यांपासून तिबेट सीमेवर नेपाळचे 12 कंटेनर अडकून पडले आहेत. माल अडकून पडल्याने नेपाळमधील व्यावसायिक राम पौडेल यांनी आत्महत्या केली आहे.
राम यांनी व्यापारासाठी दोन कोटींचे कर्ज घेतले होते. परंतु माल अडकून पडल्याने त्यांना कर्जाची परतफेड करणे अशक्य ठरले होते. चिनी कस्टम अधिकारी नेपाळी मजुरांच्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल ग्राहय़ धरत नसल्याचे नेपाळच्या अर्थ मंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱयाने सांगितले आहे.
अशा स्थितीमुळे नेपाळचे सरकार आता भूमीमार्गाने मालवाहतूक टाळण्याची सूचना व्यापाऱयांना करत आहे. नेपाळच्या व्यापाऱयांना आत कोलकाता बंदरामार्गे वाहतूक करण्यास सांगण्यात येत आहे. चीनकडून सहकार्य मिळत नसल्याने भारताचा पर्याय निवडावा लागणार आहे. कोरोना महामारी संपुष्टात आल्यावरच चीनकडून मालवाहतुकीला मंजुरी देण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. चीनच्या या भूमिकेमुळे नेपाळची चांगलीच फजिती झाली आहे.
सूती कपडय़ांचे कंटेनर
कस्टम अधिकाऱयांनुसार तिबेट सीमेवर अडकून पडलेल्या कंटेनर्समधून सूती कपडय़ांची वाहतूक होत होती. हा माल तिबेटची राजधानी ल्हासा, शिगत्से, न्यालम, केरूंग इत्यादी ठिकाणी अडकून पडला आहे. नेपाळी व्यापाऱयांनुसार तिबेटच्या शहरांमध्ये अडकून पडलेल्या मालाची किंमत 1300 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. चीनकडून ही अघोषित बंदी आहे, आपत्कालीन स्थितीतही पुरवठा रोखला जाऊ शकत नाही. तर माल वाहतूक करण्यासाठी चिनी अधिकाऱयांना लाच द्यावी लागत असल्याचे नेपाळच्या अधिकाऱयाने म्हटले आहे.
व्यापाराच्या दृष्टीकोनातून चीनसोबत नेपाळमध्ये रसुवागडी-केरुंग आणि टाटोपानी-खासा ही दोन सीमा केंद्रे आहेत. 2015 मधील भूकंपानंतर हे मार्ग बंद होते, परंतु मागील वर्षी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या नेपाळ दौऱयानंतर ते खुले करण्यात आले होते. केरुंग-रसुवागडी येथे चीनने आंतरराष्ट्रीय सीमा केंद्र विकसित केले आहे.