ऑनलाईन टीम / काठमांडू :
चीनने नेपाळच्या तब्बल सात जिल्ह्यातील जमिनीवर अतिक्रमण केले आहे. नेपाळच्या कृषी मंत्रालयाच्या अहवालात ही बाब उघड झाली आहे. नेपाळ सरकारने मौन बाळगल्याने चीनची घुसखोरी वाढत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
सिधुपालचौक, संखुआसभा, दोलखा, गोरखा, दार्चुला, हुमला
आणि रसूवा या सात जिल्ह्यातील जमिनीवर चीनने अतिक्रमण केले आहे. नेपाळच्या भूभागावर कब्जा करण्यासाठी चीनने नद्यांचा प्रवाह बदलण्याचाही प्रयत्न केला आहे. करनाली, खोला आणि बागडारे या नदीचा प्रवाह बदलून हुमला जिल्ह्यातील जमिनीवर तर सिनजेन, भुरजुक आणि जंबुआ खोला नद्यांचा प्रवाह बदलून रसुवामधील जमिनीवर चीनने अतिक्रमण केले आहे.
दोलखामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेपासून चीनने सुमारे दीड किलोमीटरच्या परिसरावर चीनने कब्जा केला आहे. गोरखा जिल्ह्यातील पिलर 35,37,38 ची जागा बदलत हाही भूभाग चीनने ताब्यात घेतला आहे. चीनचे विस्तारवादी धोरण वाढत असून, पंतप्रधान के पी शर्मा ओली यावर कोणतीही भूमिका घेत नसल्याने नेपाळला मोठा फटका बसला आहे.