तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
राज्यात उद्यापासून अनलॉक जाहीर होणार असून यामध्ये अनलॉकचे पाच टप्पे जाहीर करण्यात आले आहे. मात्र या पाच टप्प्यातील निर्बंध कसा कधी उठणार याबाबत नागरिकांत अद्यापही संभ्रमावस्था आहे.
सोलापुर जिल्हा हा अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात असून जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालू राहणार असून उर्वरित इतर दुकाने ही ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार विकेंडला बंद राहतील असे म्हटले आहे. मात्र सोलापुर जिल्ह्यातील अनलॉकचा हा तिसरा टप्पा कधी सुरु होणार की उद्यापासूनच या टप्प्यातील हे निर्बंध उठवले गेले आहेत.याबाबत नागरिकांत संभ्रम असून पहिला टप्पा जसा ७ जून पासून चालू होणार असे स्पष्ट केले आहे त्याप्रमाणे पुढील टप्पा किती तारखेला व कसा चालू होणार याबाबत मात्र स्पष्टीकरण नसल्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये दुकाने चालू करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.