ऑनलाईन टीम / टोकियो :
टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची महिला नेमबाज अवनी लेखराने सुवर्णपदकाला गवसणी घातली. 10 मीटर एअर रायफलच्या क्लास 1 मध्ये तीने हे पदक पटकावले आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या इतिहासात नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणारी अवनी पहिली खेळाडू ठरली आहे.
अवनी लेखराने 10 मीटर एअर रायफलमध्ये 229.1 गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. याआधी अवनी पात्रता फेरीत एकूण 621.7 गुणांसह सातव्या स्थानावर होती. अवनीने वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक जिंकल्याने तिचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अभिनंदन केले आहे.