एजंटराज-अधिकाऱयांच्या मनमानीमुळे जनतेची कामे प्रलंबित : सर्व्हर डाऊनचाही फटका
प्रतिनिधी /बेळगाव
कोणतीही कामे लवकर तसेच एकाच छताखाली व्हावीत यासाठी नेम्मदी केंद्रांची स्थापना करण्यात आली. मात्र गेल्या काही महिन्यांपासून शहर व ग्रामीण भागातील अनेक नेम्मदी केंद्रे बंद झाली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कामासाठी थेट कार्यालय गाठून अधिकाऱयांना गयावया करावी लागत आहे. यामुळे जिल्हय़ातील महसूल आणि प्रशासकीय विभागाच्या कारभारामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, सातबारा उतारा, वारसा यासह इतर कामांसाठी नेम्मदी केंद्रात अर्ज करावा लागत होता. नेम्मदी केंद्रात अर्ज केल्यानंतर संबंधित विभागाकडे जाऊन 45 दिवसांच्या आत ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जनतेला मिळत होती. मात्र नेम्मदी केंद्र बंद झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. काही ठिकाणी नेम्मदी केंद्रे सुरू आहेत. मात्र त्या ठिकाणी सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे ही नेम्मदी केंदे असूनही अडचणीची ठरू लागली आहेत.
अधिकाऱयांच्या बदलीनंतर एकदाही जिल्हाधिकाऱयांनी याबाबत गांभीर्य दाखविले नाही. सर्वच विभागात मनमानी कारभार सुरू आहे. काही कार्यालयामध्ये लोकप्रतिनिधींचे ऐकले जाते तर काही कार्यालयामध्ये वरि÷ अधिकाऱयांच्या आदेशानुसार कामे केली जात आहेत. यामुळे बेळगाव जिल्हय़ामध्ये महसूल किंवा इतर विभागाच्या कामांबाबत तक्रारी वाढल्या आहेत. सर्वच कार्यालयामध्ये पुन्हा भ्रष्टाचाराला ऊत आला आहे. यातच लोकायुक्त कार्यालयातील अधिकाऱयांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वच कारभार अनागोंदी सुरू आहे. तेंव्हा प्रादेशिक आयुक्तांनीच आता याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बेळगाव जिल्हय़ाचा कारभार सुधारावा, अशी मागणी होत आहे.
सर्वसामान्य जनतेची कामे करण्यास टाळाटाळ एपीएमसी, सांबरा, बागेवाडी, उचगाव या ठिकाणी सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत आहे. याचबरोबर या नेम्मदी केंद्रामध्ये एजंटराज सुरू आहे. एजंटांची कामे तातडीने केंद्रातील कर्मचारी करत आहेत. मात्र सर्वसामान्य जनतेची कामे करण्यास टाळाटाळ सुरू असल्याचा आरोप होत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी नेम्मदी केंद्राबाबत नेहमीच गांभीर्य घेतले होते. सर्वसामान्य जनतेची कामे 45 दिवसांच्या आत करा, असा आदेश त्यांनी दिला होता. तक्रारी आल्यानंतर तातडीने संबंधित अधिकाऱयांना ते धारेवर धरत होते.