पॅरा शिक्षिकांचा इशारा
प्रतिनिधी /पणजी
सरकाने केवळ आश्वासने देऊन पॅरा शिक्षिकांना गेली कित्येक वर्षे झूलवत ठेवले आहे. आता वय झाल्यामुळे दुसरीकडे नोकरीसाठी अर्ज कराचा पर्यायही आमच्याकडे उरलेला नाही. म्हणून सरकारने अम्हाला पॅरा शिक्षिका म्हणून नोकरीत कायम करावे असी आगणी पॅरा शिक्षिका स्मिता देसाई यांनी केली आहे. सरकार नोकरीत कायम करणार या आशेवर गेली कित्येक वर्षे तुटपूंजा पगारावर आम्ही काम करीत आहोत. आमच्या मागणीसाठी कित्येकवेळा शांततेत आंदोलनेही केली. अनेक वेळा मुख्यमंत्र्यासह आमदार मंत्र्याच्या भेटी घेऊन त्यांच्यासमोर आमचा प्रश्न मांडला पण आत्तापर्यंत काहीच झाले नाही. आता करो किंवा मरो अशी स्थिती झाली असून नोकरीत कायम न केल्यास प्रखर आंदोलन करू असा इशार पॅरा शिक्षिकांनी दिला आहे.
येथील आझाद मैदानावर काल सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्मिता देसई यांनी वरील माहिती दिली आहे. यावेळी त्यांच्या सोबत बबिता नाईक व इतर पॅरा शिक्षिका उपस्थित होत्या. 22 जून रोजी आम्ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन पुन्हा एकदा आमचा प्रश्न त्यांच्या समोर मांडला असता ते सांगतात की जे काय कायद्यात होणार तेच आपण करणार, याचा अर्थ काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी दिलेल्या आश्वासनाचे काय असेही त्या म्हणाल्या. एकूण 129 शिक्षिकांची स्थिती ना तळ्यात ना मळ्यात अशी झाली आहे. पर्रीकरां नंतर तत्कालीन मुख्यमंत्री पार्सेकर यांनीही नोकरीत कायम करण्याचे आश्वासन दिले होते. नोकरीत कायम करण्यासाठी विषेश प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे अशी अट आमच्या समोर ठेवली होती. विशेष प्रशिक्षण घेऊन ती अटही पूर्ण केली मात्र अद्याप काहीच झाले नाही. आमच्यावर हा अन्याय होत असून आता न्याय मिळविण्यासाठी प्रखर आंदोलन उभारणे हाच एकमेव उपाय असल्याचे स्मिता दासाई म्हणाल्या.
सोशल मिडीयाद्वारे सरकारला उघडे पाडू
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन त्यांच्या समोरही आमचा प्रश्न मांडणार. सरकारने प्रत्येक वेळी आम्हाला आश्वसने देऊन आमचा उपयोग करून घेतला तसेच आमच्यावर कसा अन्याय केला याबाबत चे व्हिडीओ क्लीप आमच्या जवळ आहेत. ते सोशल मिडीयावर प्रसिध्द करून भाजप सरकारला उघडे पाडू. इतके करूनही न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाऊ असे बबिता देसाई यांनी सांगितले.
नवे शिक्षक घेतले आम्हाला कंत्राटावरच ठेवले
व्या 15 वर्षापूर्वी आम्हाला पॅरा शिक्षिका म्हणून कंत्राटी पध्दतीवर नोकरीत घेतले होते. प्रत्येक शिक्षिकेला दोन शाळा देण्यात आल्या होत्या इंग्रजी आणि गणीत हे दोन विषय आम्ही शिकवित आहोत. कायमस्वरूपी शिक्षकांच्या बरोबरीने आम्ही काम करीत असतानाही अम्हाला तुटपुंजा पगारावर काम करावे लागत आहे. पाच वर्षे संपल्यानंतर आम्ही नोकरीत कायम करा अशी सरकारकडे मागणी केली होती. प्रत्येक वेळी कंत्राट वाढविले जात होते व नोकरीत कायम करणार असे आश्वासन दिले जात होते. दरम्यान 189 नव्या शिक्षकांची भरती करण्यात आली मात्र आम्हाला कंत्राटी पध्दतीवरच ठेवण्यात आले. आमच्या मागणीसाठी आंदोलन केले की केवळ आश्वासन देऊन आमची तोंडे बंद केली जात होती. पत्रकारांना माहिती दिल्यास नोकरीत कायम केले जाणार नाही अशा धमक्याही दिल्या जात होत्या. केवळ उद्याच्या आशेवर आम्ही मुक्याचा मार सहन करीत होतो. असे बबिता नाईक म्हणल्या.
वयात सवलत द्या नोकरीत कायम करा
कोरोना काळात जिवाची पर्व न करता आण्ही काम केले आहे. आता अनेकांना पूराचा फटका बसला असूनही त्या शिक्षिका केवळ आशेपोटी आज येथे आल्या आहेत. नोकरीत कायम केल्यास आम्हाला तसेच आमच्या कुटुंबाला अर्थिक साहारा मिळल म्हणून. सरकारमात्र आम्हीला असेच लडकवत ठेवण्याचा विचार करीत आहेत की काय. तत्कालीन सभापती आणि विद्यमान मुख्यमंत्री यांच्या समोर पर्रीकारांनी आम्हाला नोकरीत कायम करणार असे आश्वासन दिले होते. त्याचा व्हिडीओ आजही आमच्या जवळ आहे. पर्रीकरांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालणार असे सांगणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज 15 वर्षे झाली तरी आम्हाला नोकरीत कायम का करीत नाही असा प्रश्न बबिता नाईक यांनी उपस्थित केला आहे. सध्याचे भाजप सरकार सबका साथ सबका विकास म्हणत असले तरी प्रत्यक्षात मात्र सबका साथ व खूदका विकास अशीच स्थिती दिसत आहे. आम्हाला नोकरीत कायम कर तसेच ज्यांचे वय झाले आहे त्यांना वयात सवलत द्या अशी मागणी बबिता नाईक यांनी केली आहे. आता आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो असा इशारही बबिता नाईक यांनी दिला आहे.