शेतकऱयांचा जिल्हा प्रशासन, राजकीय व्यक्तींना इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकऱयांनी शनिवारी येळ्ळूर रस्त्याला लागून असलेल्या शहापूर आणि वडगाव शिवारामध्ये आंदोलन केले. येळ्ळूर रस्त्यापासून हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला सकाळीच सुरूवात करण्यात आली. या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे येळ्ळूर रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत होती. शेतकऱयांनी लोकशाही मार्गाने आपला लढा सुरूच ठेवला आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू, असा इशारा त्यांनी दिला.
सध्या या जमिनीमध्ये ऊस,भात पिके आहेत. त्यामधून हा रस्ता केला जात आहे. शेतकऱयांनी याला तीव्र विरोध केला. मात्र मोठा पोलीस फौजफाटा घेऊन या रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या रस्त्याचा खटला दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे. त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने झिरोपॉईंटबाबत आपले म्हणणे दाखल केले पाहिजे. मात्र ते करण्याऐवजी बेकायदेशीररित्या शेतकऱयांवर दडपशाही करत या रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. विरोध केला असता शेतकऱयांना ताब्यात घेण्यात आले. धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे एका शेतकऱयाच्या मुलाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले तर दुसऱया मुलाने झाडावर चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. या प्रकारामुळे सारे जण हतबल झाले आहे. या घटनेत आकाश अनगोळकर हा मुलगा 50 टक्क्मयांपेक्षा अधिक भाजला आहे. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
शेतकऱयांचा विरोध असतानाही दडपशाही करून रस्त्याचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. बऱयाच शेतकऱयांना नुकसान भरपाई मिळाली नाही. महत्त्वाचे म्हणजे तिबारपिकी ही जमीन आहे. संपूर्ण कुटुंब त्यावर अवलंबून आहे. याचबरोबर भविष्यातही अनेक जण या शेतीवर अवलंबून आहेत. मात्र त्यांचा उदरनिर्वाहच हिसकावून घेण्याचा प्रकार जिल्हा प्रशासन करत आहे, असा आरोप करण्यात आला.
तुम्ही रस्ता करा मात्र आम्ही कायदेशीर लढाई लढून न्याय मिळविणारच असा इशाराच शेतकऱयांनी दिला आहे. पोलीस प्रशासनाद्वारे दडपशाही करुन रस्ता करण्यात येत आहे. मात्र याचे उत्तर तुम्हाला भविष्यात द्यावे लागणार आहे. त्यावेळी तुम्हाला आमची ताकद समजेल, असे देखील शेतकऱयांनी सांगितले आहे. शनिवारी येळ्ळूर रस्त्याजवळ शेतकरी ठाण मांडून भर उन्हात दिवसभर बसले होते. आपल्या जमिनीमध्ये सुरू असलेला रस्ता पाहून हळहळत होते. अनेक वर्षांपासून आधार असलेली जमीन आज आमच्याकडून काढून घेतली जात आहे, अशी तळमळ महिला व्यक्त करत होत्या.
लहान मुलांसह अनेक महिला दाखल झाल्या होत्या. केवळ हताश होऊन बसण्यापलिकडे शेतकऱयांकडे कोणताच पर्याय नव्हता. लोकप्रतिनिधी किंवा राजकीय व्यक्तींकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
प्रशासनाला इतकी जमीन हवी असेल तर एखाद्या राजकीय व्यक्तीची एक गुंठा तरी जमीन त्यांनी घेवून दाखवावी, असे आव्हान देखील यावेळी शेतकऱयांनी दिले आहे. सर्वसामान्य शेतकऱयांवर दडपशाही करत राजकीय व्यक्तींच्या जमिनीला दर वाढवून देण्याचा घाट घातला गेला आहे, असेही यावेळी महिलांनी सांगितले.