ऑनलाईन टीम / लेह :
भारताने पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराजवळ मरीन कमांडोज तैनात केले आहेत. भारत-चीन संघर्षामुळे या भागात मे महिन्याच्या सुरुवातीपासून भारतीय हवाई दलाचे गरुड कमांडो आणि पॅरा स्पेशल फोर्सचे कमांडो तैनात आहेत.
पूर्व लडाखमधील सीमावादावरून एप्रिल-मे महिन्यापासून भारत-चीनमध्ये तणावाचे वातावरण असून, दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. नेहमीच कुरापती करणारा चीन थंडीच्या काळात नवी आगळीक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पँगाँग सरोवराजवळ मरीन कमांडोज तैनात करण्यात आले आहेत. या कमांडोंना सरावासाठी नवीन बोटीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
चीनने कुरापती केल्यास अत्यंत थंड हवामानाच्या स्थितीत नौदल सैनिक कमांडो आपली ताकद दाखवू शकतात. मरीन कमांडो तैनात करण्याचा उद्देश तिन्ही फळांचे एकीकरण वाढवणे हा देखील आहे.