सिद्धनेर्ली/प्रतिनिधी
पंचगंगा नदी प्रदुषण मुक्त करून पंचगंगा नदीतीरावरील इचलकरंजीसह सर्वच गावांना शुद्ध व मुबलक पाणी पंचगंगेतूनच द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या कागल तालुका कमिटीच्या वतीने कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे केली.
निवेदनात, पंचगंगा नदीवर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबित असलेल्या इचलकरंजीसह अन्य गावांसाठी प्रदूषित, दुर्गंधी युक्त पाणी पिण्यासाठी वापरावे लागतआहे. त्यामुळे पंचगंगा नदीतीरावरील नागरीकांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचगंगा नदी प्रदुषित करणाऱ्या कंपन्या व प्रदूषित करण्यासाठी जबाबदार असलेल्या सर्व घटकांवर तातडीने कारवाई करावी.
प्रदुषण नियंत्रण मंडळाने निर्भिडपणे प्रदुषण रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी व पंचगंगा नदी प्रदुषण मुक्त करून पंचगंगा नदीतीरावरील इचलकरंजीसह सर्वच गावांना शुद्ध व मुबलक पाणी दूधगंगा नदीतुन न देता पंचगगेतुनच द्यावे अशी मागणी केली आहे. यावेळी जिल्हा सेक्रेटरी कॉ शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखाली कॉ विक्रम खतकर ,कॉ मोहन गिरी ,कॉ राजाराम आरडे ,कॉ जोतिराम मोंगणे ,कॉ विजय साटपे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.