इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखानास्थळावरील ऊस तोडणी मजुरांच्या झोपड्यांना आग लागली. या आगीच्या भक्ष्यस्थानी दोन मजुरांच्या झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत सुमारे २८ हजारांची रोक , एक तोळ्याचे सोन्याचे दागिने, धान्य आणि संपूर्ण संसारपयोगी साहित्य जळून गेले. तर एक म्हैस आणि दोन रेडकू अशी तीन जनावरे या आगीत जागीच ठार झाली . आगीची माहिती समजताच कारखानास्थळावरील अन्य ऊस तोडणी मजुरांनी घटनास्थळी धाव घेवून आग त्वरीत आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीची ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.