बेंगळूर/प्रतिनिधी
पंचमसाली समाजाला जर १५ ऑक्टोबरपर्यंत २ ए प्रकारात समाविष्ट करण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला नाही तर पंचमसाली समाज या मागणीवरुन पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
समाजातील मृत्युंजय स्वामी यांच्या मते, पंचमसाली समाजाने १५ सप्टेंबरपर्यंत थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर, सरकारने १५ ऑक्टोबरपर्यंत या समाजाच्या मागणीसंदर्भात कोणतेही आदेश जारी न केल्यास पुन्हा आंदोलन सुरू केले जाईल, असे म्हंटले आहे.
पंतप्रधानांना निवेदन देण्यात येणार
मृत्युंजय स्वामी यांनी समुदाय प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या मागणीसंदर्भात निवेदन देतील, समाजाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
अलीकडे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी या मागणीसाठी सहा महिन्यांची मुदत मागितली आहे. ज्याबद्दल समाजाने सहा महिन्यांपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच २३ मार्च रोजी बेंगळूर शहरात आयोजित कार्यक्रमात बसवकल्याण ते बेंगळूर पर्यंतच्या पदयात्रेमध्ये सहभागी लोकांचा सन्मान केला जाणार आहे.