प्रतिनिधी /पणजी
राज्यातील 186 पंचायतींसाठी होणाऱया निवडणुकीच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या प्रभाग फेररचनेसाठी दि. 4 मार्च पर्यंत जनतेकडून दोन्ही जिह्यांत मिळून 913 सूचना, सुधारणा आणि दुरुस्तीसाठी अर्ज आले आहेत.
दि. 24 फेब्रुवारी पासून संबंधित मसुदे संबंधित मामलेदार कार्यालयात उपलब्ध करण्यात आले आहेत. दि. 8 मार्च पर्यंत जनतेकडून आलेल्या सूचना आणि हरकतींचा विचार केल्यानंतर प्रभाग फेररचनेस अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. त्यानंतर आरक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
उत्तरेतून 650, दक्षिणेतून 263 अर्ज
उपलब्ध माहितीनुसार उत्तर गोव्यातील पेडणे -1 मधून 70, पेडणे -2 (18), डिचोली -1 (5), डिचोली -2 (18), सत्तरी (14), बार्देश -1 (270), बार्देश -2 (78), बार्देश -3 (49), तिसवाडी -1 (110) आणि तिसवाडी -2 (17) मिळून एकुण 650 अर्ज आले आहेत.
दक्षिण गोव्यातील फोंडा -1 (28), फोंडा -2 (20), फोंडा -3 (17), धारबांदोडा (8), सांगे (9), साश्टी -1 (35), साश्टी -2 (28), साश्टी -3 (35), मुरगाव (40), केपे (26) आणि काणकोण (17) मिळून एकुण 263 अर्ज प्राप्त झाले आहेत.
या कामासाठी मामलेदार आणि संयुक्त मामलेदार यांची निवडणूक नोंदणी अधिकारी (ईआरओ) तर अव्वल कारकून व मुख्य कारकून यांची साहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (एईआरओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जनतेकडून आलेल्या सूचना आणि हरकती विचारात घेऊन ईआरओ अंतिम फेररचना प्रस्ताव तयार करतील. त्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी/जिल्हा निवडणूक अधिकाऱयांमार्फत आयोगाला सादर करणार आहेत.