ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लॉक डाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत.
सिंग म्हणाले, पंजाब ची लोकसंख्या अडीच कोटीपेक्षा जास्त आहे. पंजाब मध्ये कोरोना रुग्णांची संख्या 132 असून आत्तापर्यंत अकरा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
माझ्या मते लॉक डाऊन अजून चालूच ठेवले पाहिजे. असे नाही केले तर कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत जाईल. यामुळे संकट वाढू शकते. पुढे ते म्हणाले, आम्ही आत्तापर्यंत 2877 नमुन्यांची तपासणी केली आहे. पंजाबच्या लोकसंख्येच्या मानाने चाचणीचे प्रमाण हे फारच कमी आहे.
दरम्यान, आज होणाऱ्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ लॉक डाऊन संदर्भात निर्णय घेणार आहे. आत्ताची परिस्थिती पाहता हे संकट अधिक वाढू नये म्हणून लॉक डाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.