ऑनलाईन टीम / चंदीगड :
हरियाणा आणि उत्तरप्रदेशनंतर आता पंजाबमधील ग्रामपंचायतीही शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र करण्यात गुंतल्या आहेत. पंजाबमधील अनेक गावांमध्ये शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या प्रस्तावात प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती आंदोलनात सहभागी होण्याची अट आहे. आंदोलनात सहभागी न झाल्यास त्या कुटुंबावर 5 हजार रुपये दंडासह सामाजिक बहिष्कार टाकण्यात येणार आहे.
बठिंडा गावानंतर फरीदकोट जिल्ह्यातील पाखी कलान आणि दोड या गावातील ग्रामपंचायतींनी हा ठराव मंजूर करून गावातील जनतेला शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पाखी कलान या ग्रामपंचायतीने एक ठराव मंजूर केला असून, गावातून दर आठवड्याला 18 जण दिल्लीला जातील. दिल्लीला आंदोलनासाठी न जाणाऱ्यांना पाच हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.