वार्ताहर/ राजापूर
राजापूर तालुक्यातील सोलगाव येथील पंडीत पंचगव्य गुरूकुलने गाईच्या शेणापासून पर्यावरणपूरक पणत्या आणि गोमुत्रापासून कोरोनामध्ये निर्जंतुकीकरण करण्यास वापरण्यात येणारे सॅनिटायझर संशोधित करून विकसित केले आहे. विविध कारणांमुळे ऱहास होवून पर्यावरण धोक्यात आलेले असताना पंडीत पंचगव्य गुरूकूलने केमिकलचा कोणताही वापर न करता तयार केलेल्या पणत्या आणि सॅनिटायझरमुळे कोरोनाशी सामना करीत पर्यावरणपूरक दिवाळी साजरा करण्याची संधी मिळणार आहे.
पंडीत पंचगव्य गुरूकूलच्या सुहास पंडीत आणि सई पंडीत यांनी पर्यावरणपूरक पणती विकसित केली आहे. गाईच्या शेणापासून पणती तयार करताना मुलतानी मातीचा वापर केला जातो. त्यामुळे ही पणती पूर्णपणे जळत नसल्याने तिचा पुर्नवापर करणे शक्य आहे. एक किलो शेण आणि चारशे ग्रॅम मुलतानी माती यांचा वापर करून पर्यावरणपूरक पणती तयार करता येते. यामध्ये सुमारे एक किलो शेणापासून सुमारे सत्तर पणत्या तयार होत असल्याचे पंडीत यांनी सांगितले.
कोरोनाच्या विषाणू संक्रमण होवू नये म्हणून विविध उपाय योजनांसह सॅनिटायझरचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये मिळणारी सॅनिटायझर केमिकलयुक्त असतात. मात्र, पंडीत पंचगव्य गुरूकलने केमिकलचा वापर नसलेले सॅनिटायझर विकसित केले आहे. सांगली येथील त्यांच्या काही मित्रांनी गोमुत्राचा उपयोग करून सॅनिटायझर तयार केले आहे. त्यांच्याकडून माहिती घेवून पंचगव्य गुरूकूलमध्ये सॅनिटायझर तयार केल्याची माहिती श्री.पंडीत यांनी दिली. या सॅनिटायझरमध्ये गोमुत्र आणि कडुनिंबाचा वापर करण्यात आला आहे. त्याचा त्वचेला कोणताही अपाय होत नाही, शिवाय चुकून पोटामध्ये गेल्यास त्याचा अपाय नाही आणि निजर्तुंकीकरण चांगले होत असल्याचे पंडीत यांनी सांगितले. गोपालनकडे शेतकऱयांच्या उत्पन्नाचा नवा स्त्राsत म्हणून ओळखले जाते. मात्र, गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱयांकडून फारसे गोपालन केले जात नसल्याचे चित्र दिसते. अशा स्थितीमध्ये गाईचे शेण आणि गोमुत्रापासून विविध पदार्थ बनवून त्याद्वारे अर्थाजन करणे शक्य आहे. त्या दृष्टीने शेतकऱयांनी गोपालनाकडे पाहील्यास भविष्यामध्ये गोपालनाला चालना मिळू शकते. पंडीत पंचगव्य गुरूकूलच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात ओहे.