पंढरपूर / प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे गेल्या 48 दिवसापासून परप्रांतीय पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात अडकून होतो. या सर्व नागरिकांची विशेष रेल्वे आज पंढरपूरहून तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली रेल्वे स्थानकाकडे रवाना झाली. साधारणपणे 981 प्रवासी रेल्वेगाडीतून पंढरपूर येथून स्वगृही परतले.
लॉकडाऊनमूळे परप्रांतातील अनेक विद्यार्थी मजूर आपल्या कामाच्या ठिकाणी अडकून पडले होते. यामध्ये पंढरपुरात तब्बल 610 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या सर्व कर्मचाऱ्यांना तसेच सोलापूर जिल्हासह उस्मानाबाद येथील कर्मचाऱ्यांना देखील आज प्रशासनाने तामिळनाडूकडे विशेष रेल्वेने पाठवले.
शनिवारी दुपारी दोन वाजता पंढरपूर रेल्वे स्थानकातून विशेष रेल्वे रवाना झाली. साधारण बारा बोगी असणाऱ्या रेल्वेगाडीतून 981 प्रवासी रवाना झाले. यामध्ये एका रेल्वेच्या बोगीमध्ये ऐंशी प्रवाशी यांची मर्यादा असताना. एका बोगीत केवळ 52 प्रवासी सोशल डिस्टन्स चे पालन करून पाठवण्यात आले. यासाठी प्रवासी भाडे म्हणून तब्बल पाच लाख 49 हजार 360 रुपये रेल्वे प्रशासनाकडे जमा करण्यात आली आहे. यामध्ये एका प्रवासासाठी 560 रुपये इतके प्रवास भाडे आकारण्यात आले आहे. सदरची रेल्वे ही पूर्णपणे नॉनस्टॉप असणार आहे. पंढरपूर हॉल आज दुपारी दोन वाजता आहे रेल्वे सुटल्यानंतर तिरुचिरापल्ली या शेवटच्या स्टेशनवर रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वे गाडी पोहोचेल. असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सदरची विशेष रेल्वेला पंढरपूर स्थानकात येथील प्रांताधिकारी सचिन ढोले पोलीस उपाधीक्षक डॉक्टर सागर कवडे तहसीलदार वैशाली वाघमारे , गटविकास अधिकारी रविकिरण घोडके , शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे , पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , आरोग्य सभापती विवेक परदेशी , पंढरपूर स्थानकाचे स्टेशन प्रबंधक श्रीवास्तव आदीनी निरोप दिला.
चौकटीत –
अशी आहे प्रवाशांची संख्या…
पंढरपूर -610
माढा – 27
मंद्रूप -47
सोलापूर शहर -179
उत्तर सोलापूर -28
उस्मानाबाद जिल्हा – 90