बांगलादेश स्वातंत्र्य लढा वक्तव्यावरुन जयंत पाटील यांनी साधला निशाणा
ऑनलाईन टीम
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील आठवड्यात बांगलादेश दौऱ्यावर असताना आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता, वयाच्या 20 ते 22 दरम्यान आपण आपल्या सहकाऱ्यांसह सहभागी होत सत्याग्रह केला होता. आणि यामुळेच आपल्याला अटक ही झाली होती असं वक्तव्य केलं होतं. या वरुनच महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
जयंत पाटील यांनी यावर उपरोधात्मक भाष्य करत आपण आपल्या देशाच्या पंतप्रधांनवर विश्वास ठेवायला हवा, मात्र पंतप्रधानांना बांगला मुक्ती स्वातंत्र्य लढ्यात नक्की कधी अटक झाली, त्यांना कोणत्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते, याबद्दल थोडं स्पष्टीकरण दिल्यास देशवासीयांचा पंतप्रधानांवरील विश्वास वाढेल असे म्हटलं आहे. मोदींच्या या वक्तव्यावर राज्य तसेच देश पातळीवरुन टीका होत आहे.