कामात सुधारणा करण्यासाठी पुढाकार – सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारच्या कामकाजात आणखी सुधारणा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 77 मंत्र्यांची आठ गटात विभागणी केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून याला ‘चिंतन शिबिर’ असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकांची एकूण पाच सत्रे घेण्यात आली. सर्व मंत्र्यांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनीही अखेरच्या बैठकीला हजेरी लावली होती.
सरकारच्या कामकाजाला नवे स्वरुप देण्यासाठी पंतप्रधानांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मंत्र्यांच्या आठ नव्या गटांमध्ये प्रत्येक गटाच्या समन्वयाची जबाबदारी एका ज्ये÷ मंत्र्यावर देण्यात आली आहे. याशिवाय दोन नवीन मंत्री, काही जुने मंत्री आणि काही राज्यमंत्री देखील प्रत्येक गटात समाविष्ट आहेत. या गटांकडून विविध मंत्रालयांच्या कामकाजाला गती देण्याबरोबरच आपापसात समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच मंत्रालयांच्या कामाचा आढावा घेतला. बैठकांमध्ये सर्व मंत्र्यांकडून लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी सूचनाही मागविण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर मंत्रालयांच्या कामकाजात आणखी सुधारणा घडवून आणण्याच्या शक्मयतांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व मंत्रालयांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिक चांगला वापर करण्यावरही पंतप्रधानांनी विशेष भर दिला. या बैठकांमध्ये पंतप्रधानांनी गुजरातमधील आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात केलेल्या बैठकीचा संदर्भ देत त्याच धर्तीवर प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्र्यांना दिले. नवीन मंत्र्यांना मंत्रालयाचे कामकाज समजणे सोपे व्हावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. विविध विभागांद्वारे संयुक्तपणे राबविण्यात येणाऱया प्रकल्पांच्या पूर्ततेमध्ये अधिक पारदर्शकता आणि गती आणण्याचाही यामागे एक मोठा उद्देश आहे. केंद्र सरकारची कार्यक्षमता वाढवणे आणि वितरण व्यवस्था मजबूत करणे हा या सर्व बैठकांचा भर होता. मंत्र्यांचे आठ स्वतंत्र गट निर्माण करणे हे या दिशेने मोठे पाऊल आहे.