बेंगळूर/प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेतकऱ्यांच्या दुर्दशेबाबत उत्तर न देण्याबद्दल टीका केली आहे.
कुमारस्वामी यांनी बुधवारी पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश देण्याऐवजी वाराणसी येथे दिवे लावले. या आठवड्याच्या सुरूवातीच्या काळात पंतप्रधानांनी वाराणसीतील राज घाट येथे दीपावली उत्सवात भाग घेतला.
कुमारस्वामी यांनी दिल्ली आंदोलनात दोन शेतकरी थंड वातावरणात मरण पावल्यानंतरही केंद्र सरकारने त्यांच्या मागण्यांना उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या जीवनात दिवे लावावेत असे त्यांनी म्हंटले आहे.