ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता सोशल मीडियाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या, पूर्व लडाखमधील सीमारेषेवरून वाढलेला भारत-चीनमधील तणाव तसेच चिनी अॅपवर भारताने घातलेली बंदी या विषयांवर मोदी भाष्य करण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनचा पाचवा टप्पा आज संपत असून, उद्यापासून 6 वा टप्पा म्हणजेच अनलॉक 2.0 असेल. मात्र, खबरदारी म्हणून काही भागात लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत, यावरही मोदी बोलतील.