वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनावरील लस वाया जाऊ नये म्हणून केरळ सरकारने केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी कौतुक केले आहे. या महामारीच्या विरोधातील लढाईत लस वाया जाण्यापासून रोखणे महत्त्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले.
केरळला केंद्र सरकारकडून लसींचे 73,38,806 डोस मिळाले आणि उपलब्ध अतिरिक्त डोसेसचा वापर करत 74,26,164 डोस देण्यात आल्याचे म्हणत मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी राज्यातील आरोग्य कर्मचाऱयांचे विशेषकरुन नर्सेसचे कौतुक केले हेते.
पंतप्रधान मोदींनी विजयन यांच्या ट्विटला टॅग करत लस वाया जाण्यापासून रोखण्याप्रकरणी आरोग्य कर्मचारी आणि नर्सेसचे योगदान कौतुकास्पद असल्याचे मोदींनी नमूद पेले आहे.