ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगाल चा दौरा करत ‘अम्फान’ चक्री वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि नुकसानग्रस्तांना एक हजार कोटींची मदत घोषित केली. मात्र, या मदतीवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका केली आहे.
त्या म्हणाल्या, पंतप्रधान मोदींनी 1000 कोटी रुपये अॅडव्हान्स की पॅकेज आहेत हे सांगितले नाही आहे. त्यांनी केवळ घोषणा केली आहे. ही रक्कम कधी मिळेल, कशी मिळेल याबाबत काहीच माहिती नाही आहे. तसेच अम्फान वादळात आमचे एक लाख कोटींचे नुकसान झाले आहे. उलट आमचेच 56 हजार कोटी केंद्राकडे थकलेले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
या वादळात आत्तापर्यंत 77 लोकांचा जीव गेला आहे. बंगालमधील सुमारे सात ते आठ जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा कहर झाल्यामुळे परिस्थिती सामान्य होण्यास वेळ लागेल, असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले.