प्रतिनिधी / सातारा :
काहींच्या संस्था अडचणीत होत्या. त्या बाहेर काढतो असे गाजर दाखवल्याने त्यांनी उडय़ा मारल्या. आज त्यांचे आहे तसेच आहे. वाई, सातारा, कराड, फलटण येथील पदाधिकाऱयांनी मी माझ्या काळात ताकद देण्याचे काम केले होते. ते कशामुळे गेले हे तुम्हालाही माहिती आहे. माझ्याकडे नव्याने येणाऱयांची यादी नाही. परंतु गेलेल्यांची यादी आहे. पश्चिम महाराष्ट्रात 39 सिटींग आमदार, खासदार, माजी मंत्री गेल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नव्याने सातारा जिह्यात काँग्रेसची मोट बांधण्यात येणार आहे. त्याकरताच तालुकानिहाय आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी देशाचे वाटोळे केले, असे आरोप करत तोंडसुखही त्यांनी घेतले.
सकाळपासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तालुकानिहाय बैठकांचे आयोजन केले होते. प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱयांसह कार्यकर्त्यांची मने जाणून घेतली. यावेळी ऍड. विजयराव कणसे, धनश्री महाडिक, रजनी पवार, बाबासाहेब कदम, अविनाश फाळके, भीमराव पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, किरण बर्गे, प्रल्हाद चव्हाण, बाळासाहेब बागवान, राजेंद्र शेलार, ऍड. दत्ता धनावडे, चंद्रकांत ढमाळ, अजय धायगुडे, एस.वाय.पवार, खंडाळा पंचायत समितीच्या उपसभापती वंदना धायगुडे यांच्यासह जिह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,पश्चिम महाराष्ट्रातील 39 सिटींग आमदार, खासदार, माजी मंत्री यांची पश्चिम महाराष्ट्रातील गेलेल्यांची यादी आहे. आणखी मोठी यादी असेल. कोण कशामुळे गेले हे तुम्हाला माहिती आहे. जे अडचणीतून बाहेर काढतो असे सांगून गाजर दाखवले. त्यामुळे त्यांनी उडया मारल्या. आजही तशीच अवस्था आहे. सत्तेकरता गेले. जिह्यातील वाई, कराड, कोरेगाव, फलटणच्या पदाधिकाऱयांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. त्यांना सत्ता येणार नाही असे वाटले म्हणून ते गेले असावेत. मला काही वाईट वाटत नाही, असे त्यांनी सांगत सातारा जिह्यातील काँग्रेसच्या नव्या पदाधिकाऱयांची निवड करण्याकरता तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. नव्याने मोट बांधण्याकरता संपर्क मंत्री निवड करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.