वार्ताहर / राजापूर
राष्ट्रीयकृत बँकामध्ये खाते असलेल्या शिक्षकांच्या खात्यात वेळेत पगार जमा न केल्याने राजापूर तालुक्यातील तब्बल 550 शिक्षकांच्या दिवाळीचा गोडवाच गेल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शिक्षकांच्या खात्यात पगार वर्ग न झाल्याने शिक्षकांना पगारापासून वंचित रहावे लागल्याचे बोलले जात आहे.
राजापूर तालुक्यात सुमारे 850 पाथमिक शिक्षक आहेत. या सर्व शिक्षकांचे पगार रत्नागिरी जिल्हा बँकेमार्पत होतात. मात्र राष्ट्रीयकृत बँकेत पगार जमा करण्याचे शासनाचे आदेश असल्याने अनेक शिक्षकांनी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडले आहे. सद्यस्थितीत सुमारे साडेपाचशेच्या शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत जमा होत आहेत. पंचायत समितीकडून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पगाराची रक्कम जमा केली जाते आणि त्यानंतर बँक संबंधित शिक्षकांच्या अन्य बँकेतील खात्यावर ती रक्कम वर्ग करते.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शुकवार 13 रोजी शिक्षकांच्या पगाराची रक्कम जमा करण्यात आली. त्यानंतर त्याच दिवशी जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाती असणाऱया शिक्षकांच्या खात्यात पगार जमा झाला. मात्र राष्ट्रीयकृत बँकामध्ये खाती असणाऱया शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा झाला नाही. त्यानंतर सलग 3 दिवस दिवाळी सणाची सुट्टी असल्याने ऐन दिवाळीच्या उत्सवात शिक्षकांना पगारापासून वंचित रहावे लागले. यात शिक्षणसेवक म्हणून काम करणाऱया शिक्षकांची मोठी आर्थिक अडचण झाली. राजापुरात सुमारे 200 शिक्षणसेवक असून त्यांना अत्यल्प मानधन मिळते. मात्र ते ही दिवाळीपूर्वी न मिळाल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने जर त्याचदिवशी शिक्षकांच्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यात पैसे वर्ग केले असते तर शिक्षकांची दिवाळी गोड झाली असती, अशा पतिकिया सध्या शिक्षकवर्गातून उमटत आहेत.