तासाभरात पडला सुमारे तीन इंच पाऊस
प्रतिनिधी /पणजी
राज्यात काल बुधवारी सायंकाळी सर्वत्र मुसळधार पाउढस पडला. पणजीत अवघ्या तासाभरात सुमारे तीन इंच एवढा विक्रमी पाउढस झाला. आभाळ फ्ढाटल्याप्रमाणे कोसळलेल्या या पावसामुळे राजधानी पणजीची अवस्था बंगुळूरप्रमाणे झाली. पाणी कधी भरत नाही त्याभागात मार्केट परिसरात रस्त्यावर पाणी साचून वाहने पाण्याखाली बुडाली.
सकाळपासून असाह्य उकाडा झाल्यानंतर दुपारपासून दमट आणि ढगाळ वातावरणाने पावसाच्या येण्याची परिस्थिती निर्माण केली. दुपारी पावसाचा किंचित शिडकाव पडून गेला. संध्याकाळी 6.30 च्या दरम्यान पणजीत पावसाला सुरूवात झाली व 7.30 च्या आत एवढा मुसळधार पाऊस पडला की पणजीतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले.
कधी नव्हे तो मार्केट रस्ता पाण्याखाली
कधी नव्हे तो पणजी मार्केट रस्ता पाण्याखाली गेला. आकाश भवनकडून थेट खली दयानंद बांदोडकर रस्त्याला जाऊन मिळालेल्या तसेच दररोज माणसानी व शेकडो वाहनांनी गजबजलेल्या या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. कित्येक दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना वाहने हटविणे अशक्य होऊन बसले. अनेक ठिकाणी पदपथ ओलांडून पाणी दुकानात घुसले.
चाळीस वर्षांत एवढा पाऊस पाहिला नाही
पणजीचे माजी नगरसेवक आणि घाऊक मद्य विक्रते मंगलदास नाईक यांनी सांगितले की आपण दुकान सुरू केल्यास 40 वर्षे झाली एवढय़ा मोठ्या प्रमाणात मार्केट रस्त्यावर कधिही एवढे पाणी आपण पाहिले नाही.
दरम्यान पणजी बसस्थानक परिसर, पाटो परिसर, ईडिसी पाटो प्लाझा आदी भागात मुसळधार पावसाचे पाणी साचल्याने बराचवेळ वाहतूक व्यवस्था बंद पडली.
पणजीत ढगफुटीसारखाच पडला पाऊस
हवामान खत्याशी संपर्क साधला असता पणजीत सायं 5.10 ते 7.30 या दरम्यान दोन तासांमध्ये तीन इंच पावसाची विक्रमी नोंद झाली. ढगफ्tढटी सारखाच हा जोरदार पाऊस पडला. राज्यातील विविध भागात सर्वत्र जोरदार पावसाची नोंद झाली. सांखळी व सत्तरीभागात रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस चालू होता.
गेल्या 24 तासात राज्यात सर्वाधिक पाऊस सांगे येथे झाली तिथे 1.5 ंइंच पावसाची नोंद आहे. पेडणे 1 इंच, वाळपई, काणकोण प्रत्येकी पाऊण इंच, केपे व सांखळी येथे प्रत्येकी अर्धा इंच पावसाची नोंद झाली. राज्यात
आज उद्या मुसळधार, नारिंगी अलर्ट जारी
हवामान खात्याने आज, उद्या दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उद्या शुक्रवार दि. 9 रोजी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देत नारिंगी अलर्ट घोषित केला आहे. दि. 11 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल. जोरदार वादळीवारे वाहण्याची शक्यता असून म†िच्छामारांना खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.