नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशातील कोरोना स्थितीवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील लसीकरण स्थितीवरून राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, लसीकरण हीच महामारीला नियंत्रणात आणण्याची किल्ली आहे. मात्र, भारत सरकारला याची चिंताच नाही, असे दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबरोबर त्यांनी एक ग्राफदेखील शेअर केला आहे. यात रोज होणाऱ्या लसीकरणाचा आकडा घसरल्याचे दाखवण्यात आले आहे.
यापूर्वी राहुल गांधी यांनी एक बातमी ट्विट केली होती. त्याला राहुल गांधी यांनी कॅप्शन देत, “एक तो महामारी और उस पर प्रधान अहंकारी”, असे लिहिले होते. राहुल यांनी ट्विट केलेल्या बातमीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारवर केलेल्या आरोपांसंदर्भात भाष्य करण्यात आले होते.