मुंबई/प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं. या कारवाईचे पडसाद आज विधानसभेत आणि सभागृहाबाहेर पडसाद उमटले. भाजपाने आक्रमक भूमिका घेत राज्यात विविध ठिकाणी तसेच विधिमंडळाबाहेर आंदोलन सुरू केलं. तसेच भाजपने आज विधानसभेच्या पायरीवर बसून अभिरुप विधानसभा भरवली.
अभिरुप विधानसभा बंद करण्याचे आदेश
आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवली. भाजपचे आणि भाजपच्या मित्रपक्षाचे सर्वच आमदार विधानसभेच्या पायरीवर बसले होते. यावेळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सुरु असलेली अभिरुप विधानसभा बंद करण्याचे आदेश तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले यानंतर सुरक्षा रक्षकांनी भाजपकडून माईक आणि भाषणांचे थेट प्रसारण थांबवले. यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले. यांनतर पत्रकार कक्षात भाजपानं प्रतिविधानसभा भरवली.
पण हे मुंबई मॉडेल नाही हे मृत्यूचं मॉडेल:
अभिरुप विधानसभा बंद करण्याचे आदेश तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले यानंतर सुरक्षा रक्षकांनी भाजपकडून माईक आणि भाषणांचे थेट प्रसारण थांबवले. यांनतर भाजपनं पत्रकार कक्षात प्रतिविधानसभा भरवली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “करोनाने मुंबई, पुणेसह अख्ख्या राज्याची वाट लावली आहे. मोदींना लसी दिल्या म्हणून राज्यात जास्त लसीकरण झाले. पण मुंबईत मोठ्या प्रमाणात करोनाचे मृत्यू लपवण्यात आले. मुंबईत १७ हजार करोना मृत्यू लपवले गेले. मुंबई मॉडेलच्या नावाखाली पाठ थोपटवून घेण्यात आली. पण हे मुंबई मॉडेल नाही हे मृत्यूचं मॉडेल आहे. मविआने १५५ कोटी कोणत्या जाहिरातींवर खर्च केले,” असा सवाल फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला.