ममता बॅनर्जींचा बदलला सूर
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘बाहरी’ (परप्रांतीय) या टिप्पणीवर स्पष्टीकरण दिले आहे. आपण बंगालमध्ये तैनात करण्यात आलेल्या लाखो गुंड आणि बंदुकधाऱयांना बाहरी म्हटले होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकरता हा शब्द वापरला नव्हता असे ममतांनी म्हटले आहे. राज्यात प्रचार सुरू झाल्यापासून ममता बॅनर्जी जाहीर व्यासपीठांवर ‘बाहरी’ असा शब्द वापरत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या या टिप्पणीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्र्यांना परप्रांतीय ठरविलेले नाही. आम्ही असे का करू? बंगालमध्ये तृणमूलला पराभूत करण्यासाठी तैनात केलेले बंदुकधारी गुंड कोरोनाही घेऊन आले आहेत. ते राज्याबाहेरील असल्याचे उद्गार ममतांनी काढले आहेत.
नंदीग्राममध्ये विजयाचा भरवसा नसता तर मी एकाच मतदारसंघात का लढले असते? भवानीपूरच्या जागी नंदीग्राम येथून निवडणुक लढविण्याचा उद्देश भूमी आंदोलनाचा सन्मान करणे होता. भाजपने कितीही प्रयत्न केले तरीही नंदीग्राममध्ये त्याला विजय मिळणार नाही. राज्यात दोन-तृतीयांश बहुमत मिळणार असल्याचा दावा ममतांनी केला आहे.
कूचबिहारच्या सीतलकुची घटनेवरून एक ध्वनिफित प्रसारित झाली होती. मारले गेलेल्या लोकांच्या मृतदेहांसह रॅली काढण्याची सूचना ममता बॅनर्जी यात पक्षाच्या उमेदवाराला करत असल्याचे यात ऐकू येते. यावरून ममतांवर जोरदार टीका झाली होती. मी काहीच बेकायदेशीर विधान पेलेले आही. मृतांचा सन्मान करू इच्छित होते, त्यांच्या कुटुंबांना भेटू इच्छित होते असे स्पष्टीकरण ममतांनी दिले आहे.