प्रतिनिधी /पणजी
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अनेक कलाकार आपापल्या कलेचे विविध माध्यमातून सादरीकरण करीत असतात. इब्रामपूर येथील वसंत हळर्णकर व त्यांच्या कुटुंबीयांनी पतांकाच कलात्मक अविष्कार घडवीला असून त्यांच्या या कलेला उत्स्पूर्थ दाद मिळत आहे.
आजच्या धकाधकीच्या काळात कुणालाच वेळ नसतो. प्रत्येक व्यक्ती आपल्याच कामात मग्न असतो. मोबदला काहीच नाही उलट पदरचे पैसे खर्च करून कला जोपासणे असे व्यक्ती क्वचीतच असतात त्यातीलच एक वसंत हळर्णकर. त्यांनी पताकांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ व श्री गुरुदेवा दत्त सुरेखपणे साखारलेला आहे.
हळर्णकर पुटुंबीय अनेक वर्षापासून ही कला जोपासत आहेत. या अगोदर त्यांनी साईबाब व पांडुरंग, शिवशंकर अशा कलाकृती साखारलेल्या आहेत. यावर्षी श्री स्वामी समर्थ व श्री गुरुदेवा सुरेखपणे साखारली आहे. सुमारे 42 डजन पतांकांचा वापर करून तब्बल 17 दिवसात त्यांनी हे काम पूर्ण केले आहे. असे वसंत हळर्णकर यांनी सांगितले.
वास्तविक हे काम तसे अवघडच आहे. त्यासाठी आवड हवीच त्याच बरोबर सय्यमही हवा असतो, शिडी किंवा टेबल खूर्चीवर उभे राहून पताका लावणे म्हणजे एकप्रकारची कसरतच करावी लागते. परंतु दृढ इच्छ असेल तर कोणतेही काम अशक्य नाही याच्यावर आमचा विश्वास आहे, म्हणूनच तर हे काम मी व माझे कुटुंबीय साखारू शकलो असे वसंत हळर्णकर यांनी सांगितले. दर वर्षी एक वेगळा विषय घेऊन ही काला साखारण्याचा मी व माझे काका सत्यवान हळर्णकर तसेच इतर पुटुंबीय प्रयत्न करीत असतो. स्वामी समर्थ हा दत्तगुरुचाच एक अवतार असल्याने आम्ही स्वामी समर्थ व दत्तगुरु असे दोन देखावे पतांकाच्या माध्यमातून घडवीले आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने चार लोक आमच्या घरी येतात आणि आमची कला पाहून स्तूती करतात हेच आम्हाला खरे समाधान मिळते असेही वसंत यांनी प्रंजाळपणे सांगितले.
कलेच्या माध्यमातून अर्थीक फायदा मिळो किंवा न मिळो, कुणी जाणकाराने कलेची स्तूती केली तर त्या कलाकाराला सर्व काही मिळून जाते त्यातच त्याचे समाधान असते. कलाकार स्तूतीला भूकेलेला असतो केवळ अर्थीक फायद्यासाठी नव्हे. असेही त्यांनी सांगितले. आम्ही या कलेचा प्रशिक्षण घेतलेले नाही जन्मताच देव कृपेने मिळालेली आमची ही छोटीशी कला सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आम्हाला एक व्यासपीठ मिळते त्याचा आम्ही फायदा घेतो असेही वसंत म्हणाला. माझे वडील दिलीप हळर्णकर हे एक चांगले नाटय़ कलाकार होते. त्यांनी अनेक नाटकातून चांगल्यापैकी अनेक भुमीका रेखाटलेल्या आहेत. त्यांच्यातूनच आपल्याला हा कलेचा वारसा मिळाला असेल असे मि मानतो. आज माझे वडील आमच्यात नाही पण आमच्यातील कलेल्याच्या माध्यमातून आजही ते आमच्यात आहे असेच आम्हाला वाटते. त्यांचा वारसा जपणे हेच आमचे परमकर्तव्य आहे असेही वसंत यांनी सांगितले.