कडेगाव : प्रतिनिधी
कडेगाव तालुक्यातील पत्रकार सुरज जगताप यांच्यावर वाळू तस्करांकडून झालेल्या हल्ल्याचे कृत्य चुकीचे असून संबंधितांवर कारवाईची पत्रकारांची मागणी योग्य आहे. आपण याबाबत प्रशासनाशी बोलून संबंधित गुन्हेगार आणि शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईचा निर्णय घेऊ असे आश्वासन राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिले
विटा येथे सुरू असलेल्या पत्रकारांच्या धरणे आंदोलनाला डॉ कदम आणि युवा नेते जितेश कदम यांनी भेट दिली. यावेळी डॉक्टर विश्वजीत कदम यांनी अशाप्रकारे हल्ल्याची घटना सहन केली जाणार नाही संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून पुढील गंभीर कारवाईबाबत निर्देश देऊ असेही राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.