चोरीच्या घटनांमध्ये वाढ : लघुउद्योजक आर्थिक अडचणीत, पायाभूत सुविधांपासून वंचित
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावची औद्योगिक वसाहत असणाऱया उद्यमबाग येथे पथदीप नसल्याने संपूर्ण परिसर अंधारात आहे. या समस्येकडे ना महानगरपालिकेचे लक्ष ना डीआयसीचे. यामुळे कामगारांना रात्रीच्यावेळी अंधारातून ये-जा करावी लागत आहे. वेळच्या वेळी टॅक्स भरूनही पथदीप का नाहीत, असा प्रश्न येथील उद्योजक व कर्मचारी विचारत आहेत.
प्रत्येक वषीच्या अर्थसंकल्पामध्ये उद्योग क्षेत्रासाठी कोटी रुपयांचा निधी जाहीर होतो. उद्योग क्षेत्रावरच मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत. निधी जरी मंजूर झाला तरी प्रत्यक्षात मात्र पायाभूत सुविधांसाठी उद्योजकांना भांडावे लागते. मग हा निधी जातो तरी कोठे? बेळगावच्या औद्योगिक वसाहतींमध्ये ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना शौचालयांची, पथदीप तर मागील वर्षानुवर्षे बंदच आहेत. त्यामुळे बेळगाव महानगरपालिकेला सर्वाधिक कर देणारा उद्यमबाग परिसर पायाभूत सुविधांपासून वंचित आहे.
काम कुठे रखडले ?
उद्यमबाग येथे केवळ मुख्य मार्ग वगळता इतर मार्गांवरील पथदीप बंद आहेत. पथदीप बसविण्यासाठी मध्यंतरी निधी मंजूर झाल्याची माहिती उपलब्ध झाली होती. परंतु त्यानंतर पथदीप बसविण्याचे काम का रखडले हे मात्र कोणालाच माहीत नाही. कोणत्याही विभागाकडे चौकशी केल्यास दुसऱया विभागाकडे बोट दाखविले जाते. या सर्वामध्ये उद्योजक मात्र भरडला जात आहे.
पथदीपांअभावी चोऱयांचे प्रमाण वाढले
उद्यमबाग येथे मोठय़ा कारखान्यांसोबतच लघु उद्योजक आहेत. मोठय़ा कारखान्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व सिक्मयुरिटी कर्मचारी साहित्यावर लक्ष ठेवून असतात. परंतु लघु उद्योजकांकडे केवळ एक-दोन कामगार असल्याने त्यांना हा खर्च परवडणारा नसतो. तसेच शेडही लहान आकाराचे असते. त्यामुळे बरेचसे साहित्य शेडच्या बाहेर ठेवावे लागते. पथदीप बंद असल्याने याचा फायदा चोरांना होत आहे. रात्रीच्यावेळी शेडच्या बाजूला टाकलेले लोखंडी साहित्य चोरीला जात आहे. मागील महिन्याभरात सात ते आठ ठिकाणी चोरीचे प्रकार घडले आहेत. यामुळे लघु उद्योजक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.