उच्च शिक्षणमंत्री डॉ. अÍवथ नारायण यांची माहिती : नव्या शिक्षण धोरणासंबंधी कुलगुरुंशी चर्चा
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी सोमवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा केली. येत्या 23 ऑगस्टपासूनच पदवी महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
राज्यात तयार करण्यात आलेल्या एकीकृत विद्यापीठ आणि महाविद्यालय व्यवस्थापन व्यवस्थेद्वारे विद्याथ्याची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल. नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यासाठी केंद्र सरकारने 15 वर्षांचा अवधी दिला आहे. राज्य सरकारने मात्र, 10 वर्षातच त्याची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 7 ऑगस्ट रोजी अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. यासंबंधीची मार्गसूचीहि जाहिर करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
नव्या शिक्षण धोरणामध्ये मातृभाषेवर अधिक भर देण्यात आला आहे. 2021-22 या वर्षापासूनच हे धोरण लागू होत असल्याने पदवी आणि पदव्युत्तर पदवीचा विषयनिहाय अभ्यासक्रम तयार करण्यासाठी 32 तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे. त्यानुसार तीन वर्षांचा पदवी आणि दोन वर्षांचा पदव्युत्तर कोर्स किंवा 4 वर्षांची ऑनर्स पदवी अधिक 1 वर्षाच्या पदव्युत्तर पदवी अध्ययनासंबंधीचा विषयनिहाय अभ्यासक्रम तयार करण्याची सूचना तज्ज्ञांच्या समितीला देण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
विषयनिहाय समित्यांकडून सादर होणार्या अहवालाच्या आधारे संबंधित विषयाचा अभ्यासक्रम निर्धारित केला जाणार आहे. येत्या 31 ऑगस्टपूर्वी अभ्यासक्रम तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. यासंबंधी कुलगुरुंशी चर्चा करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने नवे शिक्षण धोरण जाहिर केल्यानंतर लगेचच कर्नाटकात हे धोरण जारी करण्यास मंजुरी देण्यात आली. विद्याथ्याना आपल्याला हवा असणारा कोर्स निवडण्याचे अनेक पर्याय या धोरणामध्ये आहे. शिवाय 40 टक्के डिजिटल शिक्षणाची संधीहि निर्माण करण्यात आली आहे. डिजिटल शिक्षण सक्तीचे नाहि. आवश्यकता असणारेच हा पर्याय निवडू शकतात. याविषयी गोंधळ नको, असे स्पष्टीकरणहि त्यांनी यावेळी दिले.